Monday, January 26, 2026
Homeदेश विदेशHema Malini: "ही घटना घडली जी खरी आहे पण तितके मोठे काही...

Hema Malini: “ही घटना घडली जी खरी आहे पण तितके मोठे काही घडले नाही”…; प्रयागराज चेंगराचेंगरीवर हेमा मालिनींचे विधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारला घेरलं आहे. अशातच मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी या चेंगराचेंगरीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आम्‍हीही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला भेट दिली होती. येथे चेंगराचेंगरीची घटना घडली ; पण ती इतकी मोठी नव्‍हती, असा दावा भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केला. उत्तर प्रदेश सरकार महाकुंभमेळ्यासारख्या भव्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे करत आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. हेमा मालिनी यांच्या या विधानावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला घेरले आहे. तर दुसरीकडे भाजप डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांना महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत विचारले असता ही काही मोठी घटना नसल्याचे म्हटले. हेमा मालिनी यांनी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना, “मी महाकुंभात गेले होते. आम्ही खूप छान आंघोळ केली. सगळे खूप छान झाले. ही घटना घडली जी खरी आहे पण तितके मोठे काही घडले नाही. घडले पण ते किती मोठे आहे, ते काय आहे मला माहीत नाही. पण तिथे खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित केले आहे. सर्व काही खूप चांगले चालले आहे. घटना वाढवून चढवून सांगितली जात आहे,” असे हेमा मालिनी म्हणाल्या.

- Advertisement -

मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ६० जण जखमी झाले होते. मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

YouTube video player

आदल्या दिवशी, अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना, आज त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मृतांची खरी संख्या उघड करण्यास सांगितले.

“सरकार सतत अर्थसंकल्पीय आकडेवारी देत ​​असताना, कृपया महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देखील द्या. महाकुंभाच्या व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची माझी मागणी आहे. महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेल्या आणि सापडलेल्या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी,” असे अखिलेश यादव यांनी संसदेत बोलताना सांगितले. अखिलेश यादव यांनी सत्य लपवणाऱ्या महाकुंभमधील अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

गिरीश

Nashik News: “मला सस्पेंड केलं तरी चालेल,पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं...

0
नाशिक | Nashikदेशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नाशिकमधील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या...