मुंबई | Mumbai
राज्य सरकार एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान राबवत असतांना दुसरीकडे राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या (Violence Against Women) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना कोल्हापुरातील (Kolhapur) करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडली असून एका पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आश्विनी पाटील असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचा दोन मुली झाल्याने पतीकडून (Husband) छळ सुरू होता. त्यानंतर दोघांत वाद झाल्याने नराधम पतीने विजेचा शॉक (Electric shock) लागल्याचा बनाव करत पत्नीची गळा आवळून हत्या केली.
दरम्यान, अश्विनी पाटील हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती एकनाथ पाटील याच्याविरोधात हत्या केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी (Police) त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोरीच्या साहाय्याने अश्विनीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. तसेच त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक (Arrested) केली असून या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरले आहे.