Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रदोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच! - मुख्यमंत्री देवेंद्र...

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

उद्धव आणि राज हे ठाकरे दोघे बंधू जर एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. कोणी जर आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारणच नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एकाने साद दिली आणि दुसऱ्याने प्रतिसाद दिला. पण शर्तीही ठेवल्या आहेत, त्यावर मी काय बोलणार. याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे. पण यावर प्रसार माध्यमातच जास्त विचारमंथन सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

पण आगामी मुंबई महापालिका असोत वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका असोत. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच या सर्व निवडणुका जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...