Friday, May 16, 2025
Homeनगरधान्याचा काळा बाजार करणार्‍यांकडून जिवितास धोका

धान्याचा काळा बाजार करणार्‍यांकडून जिवितास धोका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

काळा बाजारात विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवणूक करून ठेवलेले रेशनिंगचे धान्य प्रशासनाला पकडुन दिल्याचा राग धरून दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार सुरेशनगर (ता. नेवासा) येथील व्यक्तींनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. निवेदनावर सतीश नानासाहेब क्षीरसागर, अमोल अशोक नवथर, विजय कल्याण उभेदळ, सागर अशोक खंडागळे, विनोद बाजीराव निकाळजे, प्रकाश सखाराम नवले, गणेश योसेफ दळवी (सर्व रा. सुरेशनगर, ता. नेवासा) यांच्या सह्या आहेत. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरेश दगडु उभेदळ, अमृत सुरेश उभेदळ, गणेश शिवाजी वरखडे, बाबासाहेब उत्तम गायकवाड, सुनील बाबासाहेब गायकवाड व इतर 7 ते 8 अनोळखी इसम (सर्व रा. सुरेशनगर, ता. नेवासा) यांचे रेशनिंगचे धान्याचा काळाबाजार करत असताना त्यांच्या धान्याच्या गाड्या आम्ही प्रशासनाला पकडून दिल्यामुळे ते दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न इतर लोकांना सांगून करत आहेत.

तसेच त्यांनी आम्हाला दमबाजी केली त्याची माहिती आम्ही 112 या हेल्पलाईन नंबरवर कळविली आहे. रेशनिंगची साठेबाजी व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असून देखील त्यांना आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. याचाच फायदा ते घेत असून ते त्यांच्या इतर अनोळखी लोकांमार्फत आमच्यावर दबाव व दमदाटी करत,‘तुम्ही केस मागे घ्या, अन्यथा तुम्हाला याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटी, विनयभंग, दरोडे असे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अमोल अशोक नवथर, बाबर विजय खंडेराव व विनोद बाजीराव निकाळजे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सुरेश दगडू उभेदळ याचे रेशन दुकान सुदाम कदम यांच्याकडे हस्तांतरित केले असून चार गाळ्यांतील रेशनचे धान्य कदम यांना न देता केवळ एकाच गाळ्यातील धान्य त्यांना देण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या कारवाईत सुमारे सहाशे ते सातशे रेशनच्या धान्याचे कट्टे जप्त करण्यात आले असून याबाबत अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अटकेस टाळाटाळ

सुरेश उभेदळ व इतरांविरूध्द खुनाचा प्रयत्न व अवैध धान्याची साठवणूक प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होऊन 10 ते 12 दिवस झाले, तरीही नेवासा पोलीस गुन्ह्यातील आरोपींना अटक करत नाहीत. त्यांना अटक करण्यास ते टाळाटाळ करत आहेत. यामुळे नेवासा तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....