Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य आणि साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे २० रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

YouTube video player

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर तसेच इतर वस्तूंचे वितरण करण्यात येते.

या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन मिळणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीवरून झेडपी, जिल्हा रुग्णालयात पत्रप्रपंच!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे हे प्रशासनावरील पकड व शिस्तीसाठी गणले जातात. मात्र, त्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणीच्या दिलेल्या आदेशाला अहिल्यानगर जिल्हा...