Sunday, September 22, 2024
Homeक्रीडाभारतीय महिला संघ ठरला टी-२० विश्वचषकाचा वेजेता

भारतीय महिला संघ ठरला टी-२० विश्वचषकाचा वेजेता

भारतातील महिला ह्या कुठेही कमी नाहीत हे दाखवून देणारी कामिगिरी आज आपल्या महिला क्रिकेट (Cricket) संघाने केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आजचा रविवारचा दिवस खूपच आनंदाचा ठरला आहे.

- Advertisement -

आज दि २९ रोजी, १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२३ (T20 World Cup) स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच रंगला, यामध्ये गर्ल टीम इंडियाने ७ गडी राखत, इंग्लंडला धूळ चारली आहे. हा विजय मिळवत संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला (England) धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.

कर्णधार शफाली वर्मा (Shefali Verma) हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले.

इंग्लंडने ठेवलेल्या ६९ धावांचा पाठलाग करताना भारताची (India) चांगली सुरुवात झाली मात्र १६ धावांवर कर्णधार शफाली वर्माला १५ (११) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ ५(६) धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली. मात्र २४(३७) करून त्रिशा बाद झाली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर अवघे ६९ धावांचे  माफक लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर त्यांनी लिबर्टी हीपच्या स्वरुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स हिला देखील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे अवघड झाले तिने केवळ ४ धावा केल्या. पहिल्या १० षटकात केवळ ३९ धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

नियाम फिओना हॉलंड १० (८), रायना मॅकडोनाल्ड गे १९ (२४), अलेक्सा स्टोनहाउस ११(२५) आणि सोफिया स्मेल ११(७) वगळता कोणालाही दोनआकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि कर्णधार अष्टपैलू शफाली वर्मा यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले. एकूणच महिला संघाच्या या कामगिरीने क्रिकेट विश्वात आपले नाव ऐतिहासिकरित्या कोरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या