देवळा । प्रतिनिधी | Devla
तालुक्यात बांधकाम विभागाकडून (Construction Department) होत असलेली रस्त्याची कामे (road work) निकृष्ट दर्जाची होत आहेत. अनेक रस्त्यांच्या कामाची मुदत संपूनही ती अपूर्णच असल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
निकृष्ट दर्जा (Poor quality) अपूर्ण कामामुळे या रस्त्यावर धुळीचे (dust) साम्राज्य पसरून मार्गस्थ होणार्या नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे. या निकृष्ट रस्ता कामाची येत्या पंधरा दिवसांत चौकशी व्हावी अन्यथा जनआंदोलन (mass agitation) छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेसतर्फे (congress) देण्यात आला आहे.
तालुक्यातील निकृष्ट दर्जामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच दोन वर्षांपासून मालेगाव (malegaon)- दाभाडी (dabhadi) रस्त्याचे कासव गतीने होत असलेल्या कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे यांना तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांनी निवेदन (memorandum) सादर केले.
यावेळी मालेगाव-दाभाडी या प्रमुख रस्त्यासह तालुक्यातील सौंदाणे, आघार-मालेगाव, येसगाव-मळगाव, दाभाडी-आघार, पोहाणे-रामपुरा, रावळगाव-अजंग, करंजगव्हाण रस्ता रुंदीकरणासह (Road widening) झोडगे- अस्ताने, राजमाने-टिंगरी इत्यादी गावांतील रस्त्यांची निकृष्ट कामे होत असलेल्या कामांसंदर्भात अभियंता शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले.
रस्त्याचे काम (road work) कासव गतीने होत असून दोन वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ण झालेला नाही. साईडच्या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे या मार्गावर अपघाताच्या (accidents) घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने शासनाचा निधी (fund) वाया जात आहे.
मात्र लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनदेखील दखल न घेता या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला. या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून प्राप्त व वितरीत झालेले अनुदान, काम करणार्या ठेकेदारांची नावे तसेच कामाच्या गुणवत्तेचा प्रयोगशाळेतील अहवाल, काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत इत्यादी माहिती विनाविलंब द्यावी तसेच
निकृष्ट रस्ता कामाची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करत जनतेला दिल्यास द्यावा अन्यथा तालुका काँग्रेसतर्फे व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. या शिष्टमंडळात यशवंत खैरनार, नीलेश थोरात, शशिकांत खैरनार, सेवादल अध्यक्ष सतीश पगार, नितीन बच्छाव, डॉ. अरुण पठाडे, रामभाऊ हाके, कन्नोर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.