Sunday, March 30, 2025
Homeजळगावविकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

जळगाव  – 

सोशल मीडियाच्या चर्चेवरुन भाजपा नगरसेवकात, तसेच सेना सोडून गेलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विकासकामे होत नसल्याने आणि राज्यस्तरावर भाजपाचे सरकार बदलल्याने अनेक भाजपा नगरसेवक अस्वस्थ आहेत.

- Advertisement -

त्यामुळे सेनेतून भाजपात गेलेले अनेक पुन्हा सेनेत परतीच्या मार्गावर आहेत. सेना मात्र फोडाफोडीचे राजकारण करीत नाही, विकासकामासाठी जर कुणी आम्हाला येवून मिळत असेल, अन सत्तेचे गणित जुळत असेल तर वरिष्ठ पातळीवरुन जो निर्णय होईल तो आम्ही घेवू, शेवटी विकासकामे ही थांबून राहू नये अशी माहिती पत्रकार परिषदेत मनपा शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक बंटी जोशी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

स्थानिक नेतृत्व सपशेल अपयशी

केंद्र, राज्य तसेच जळगाव मनपात सत्ता असतांनाही स्थानिक नेतृत्व निधी सपशेल फेल झालेले आहे.  1100 कोटीचा निधी आणल्याचा आव आणणार्‍या स्थानिक नेतृत्वाने एक दमडीही आणली नाही, आमची सत्ता असतांनाचे 100 कोटींपैकी 7 कोटी अद्यापही पडून आहेत. या 7 कोटीच्या निधीची वारंवार मुदतवाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

नगरसेवकांचा नेतृत्वावर विश्वास नाही

अनेक वार्डात विकासकामे नाहीत, अनेक कामांचे कार्यादेश निघालेले असतांनाही कामे सुरू नाहीत, याचे कारण मुख्य कारण म्हणजे मक्तेदारांसह नगरसेवकांचाही विश्वास स्थानिक नेतृत्वावर राहिला नाही, सरकार बदलल्याने निधीची चिंता आतापासूनच नेतृत्वाला सतावू लागली आहे. त्यामुळे आता यापुढे निधी मिळणार की नाही, आपल्या वार्डात विकासकामे होतील की नाही यावरुन भाजपा नगरसेवकही अस्वस्थ आहेत.

आश्वासनाची केवळ खैरात

14 महिने सत्तेत असल्यानंतरही अनेक विकासकामे झाली नाहीत. मोठे उद्योग शहरात आणण्याच्या वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र एक तरी उद्योग आणला आहे का ? असा प्रती सवालही त्यांनी यावेळी केला.  राज्यातील सत्ता बदलाने त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही होवू पाहत आहेत. सत्ता बदलाने आता यापुढे विकासकामांना निधी मिळणार की नाही म्हणूनही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Train Accident : ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डब्बे...

0
दिल्ली । Delhi ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये...