Thursday, January 8, 2026
Homeजळगावकिशोरा पाटील यांचा विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित!

किशोरा पाटील यांचा विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित!

पाचोरा । प्रतिनिधी
पाचोरा-भडगाव तालुक्यात आ.किशोर पाटील यांनी जवळपास तीन हजार कोटीची विकास कामे केली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. तर पाचोरा व भडगाव शहराचे रूपच बदलविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असल्याचे भाजपा उपाध्यक्ष मधुकर काटे, भाजपा विधानसभा संयोजक अमोल पाटील यांनी बोलून दाखविले.

भाजप पुर्ण ताकदीनिशी किशोर अप्पांच्या पाठीशी

- Advertisement -

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे पुर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या पाठीशी आहे. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते हे जोमाने अप्पाचा प्रचार करीत आहेत. भाजपचे विधानसभा निरीक्षक तथा अहमदाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेत महायुतीचे प्रचार करण्याच्या सुचना केल्या आहेत व मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केल्याचे मधुकर काटे व अमोल नाना पाटील यांनी सांगीतले.

YouTube video player

पाचोरा तालुक्यात ‘विकास’बोलतोय
आ.किशोर पाटील यांनी पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकास कामे केले आहेत. शहरात व्यापारी संकुल, हिवरा नदीवरील पुल,भूमिगत गटार योजना, ओपनस्पेस चा विकास, तारखेडा, माहेजी येथे झालेले 33/11 केव्ही सबस्टेशन, पहूर ते पाचोरा रस्त्यासाठी मंजुर केलेला निधी, पाचोरा शहरात प्राचीन प्रभु रामचंद्र मंदिर परिसरासाठी आणलेला निधी, याशिवाय काकणबर्डी, पिंपळगाव हरेश्वर, सुकळेश्वर मंदिर, बहूळा प्रकल्पासाठी पर्यटन विकासासाठी मोठ्प्रयाप्रमाणात निधी आणला आहे. नगरदेवळा गटात गडद, तितुर नद्यांवर बांधलेले बंधार्‍यामुळे शेतकर्‍यांना मोठा लाभ झाला आहे. किशोर आप्पा म्हणजे विकास असे सुत्र झाले आहे.

विकासाचा अनुशेष भरला
किशोर पाटील यांनी भडगाव शहराचे रूप पुर्णत: बदलविण्याचे काम केले आहे. भडगाव शहरासाठी 133 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुर करून शहराचा पुढील 25 ते 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात गिरणा नदीवर पक्का बंधारा बांधण्यात येणार आहे. शिवाय जलशुद्धीकरण प्रकल्पाचा ही यात समावेश आहे. याशिवाय गिरणा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ केंद्राचा झालेला विकास, तळणी परीसराचा होत असलेला विकास, भूमिगत गटारीसाठी मंजुर करण्यात आलेला नीधी, ओपनस्पेस चा झालेला विकास, मुख्य रस्ताचे झालेले कॉक्रीटीकरणाचे काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे जनता ही त्याच्यां सोबत असल्याचे भाजपचे विधानसभा संयोजक अमोल नाना पाटील यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....