Thursday, May 22, 2025
Homeनाशिकबालकावर बिबट्याचा हल्ला

बालकावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर। प्रतिनिधी | Sangamner

- Advertisement -

तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात (दि.3) मध्यरात्री एका उसतोड मजुराच्या (Sugarcane workers) झोपडीत शिरत बिबट्याने (leopard) त्यांच्या 3 वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला (Assault) करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली.

ऊसतोड मजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या (leopard) जबड्यातून सोडवण्यात यश आले. मुलाची प्रकृती चितांजनक असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

साखर कारखान्यांचा (sugar factories) गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ जळगाव (jalgaon) येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊस तोड मजूर कुटुंबियांसह राहत आहेत. रात्रीच्यावेळी हे ऊसतोड मंजूर आपल्या कोप्यांमध्ये झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला विरु अजय पवार (3) याला जबड्यात घेऊन शंभर ते दिडशे फुटावर पलायन केले.

चिमुकला जोर-जोरात ओरडल्यामुळे वडीलासह शेजारील ऊस तोड मंजूरानी या बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली. चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव सुरु झाला. मजूरांनी त्याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (Rural hospital) उपचारासाठी दाखल केले.

मात्र, चिमुकल्याची प्रकृती खालवत असल्याने त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार आहेत. दरम्यान, मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी तिरावरील गावांमध्ये बिबट्याचा वावर असून शेतकर्‍याच्या पशुधनासह नागरीकावर प्राणघातक हल्ले होत आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) पहिली घटना 20 वर्षापूर्वी पिप्रीं लौकी आजमपूर या भागात घडली होती. मात्र, 20 वर्षानतंरही कोणतीही आश्वासक उपायोजना होत नसल्याने नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे. यानिमित्ताने संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून े बिबट्याचे हल्ले चितेंंचा विषय ठरत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : “पालक कोण होईल त्याची काळजी करू नका, मी...

0
नाशिक | Nashik महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३७ जागांवर घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले होते. त्यानंतर...