Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; फडणवीसांनी जाहीर केली आकडेवारी

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; फडणवीसांनी जाहीर केली आकडेवारी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे सांगितले जाते.

असे असतानाच आता 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर आकडेवारीही जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्रीय जनतेचं अभिनंदन केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अतिशय आनंदाची बातमी! देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२,४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) झाली आहे. मागील दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

हे ही वाचा : अकोलेच्या भाजप नगरसेवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल

वेगवेगळी राज्ये व त्यांना मिळालेली परकीय गुंतवणूक

महाराष्ट्र – ७०,७९५ कोटी रुपये
कर्नाटक – १९०५९ कोटी रुपये
दिल्ली – १०,७८८ कोटी रुपये
तेलंगणा – ९०२४ कोटी रुपये
गुजरात – ८५०८ कोटी रुपये
तामिळनाडू – ८,३२५ कोटी रुपये
हरयाणा – ५८१८ कोटी रुपये
उत्तरप्रदेश – ३७० कोटी रुपये
राजस्थान – ३११ कोटी रुपये

हे ही वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद

फडणवीस यांनी म्हटलं आहे की “या सर्व राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी, (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती.

उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे.

हे ही वाचा : पाण्याच्या वादातून खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप

- Advertisment -

ताज्या बातम्या