Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याMaharashtra News : अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; महायुती सरकारचा मोठा...

Maharashtra News : अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Government) अपघातग्रस्त रुग्णांना १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात रूग्णालयांची (Hospital) माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल अॅपदेखील तयार करण्यात येणार आहे. याशिवाय दर महिन्याला प्रत्येक रूग्णालयाने आरोग्य शिबीर घेऊन किमान पाच रूग्णांवर कॅशलेश उपचार करणे बंधनकारक असणार आहे. तर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister) अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून, एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार (Ration Shopkeeper) व सेवा केंद्रांच्या मदतीने वाटप होणार आहे. या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे करण्याचे निर्देश देखील आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...