Sunday, May 18, 2025
Homeनगरमहाविकास आघाडीचे काही नेते फक्त सोशल मिडीयावरच दिसतात

महाविकास आघाडीचे काही नेते फक्त सोशल मिडीयावरच दिसतात

उंबरे |वार्ताहर| Umbare

- Advertisement -

वांबोरी चारी लवकरच सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणार असून वांबोरी चारी टप्पा-2 योजनेला देखील पुढील काळात सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडीचे काही नेते सोशल मिडियावरच दिसतात अशी टीका खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.

वांबोरी चारीला मुळा धरण येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाषराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, सुरसिंग पवार, अर्जुन पानसंबळ, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, सुरेशराव बानकर, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी उपस्थित होते.

खा.डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, वांबोरी चारीला वेळोवेळी शासनाचा निकष बदलून निधी उपलब्ध करून योजना सुरू ठेवण्याचे काम हे माजी आ.कर्डिले यांनीच केलेले आहे. टेल टू हेड शेतकर्‍यांना पाणी मिळण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले जाईल. सरकारच्या माध्यमातून लवकरच वांबोरी चारी तसेच बुर्‍हाणनगर व इतर 72 गावांच्या पाणीपुरवठा योजना या सौर ऊर्जेवर कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न करू. महाविकास आघाडीचे नेते फक्त सोशल मीडियावर दिसतात असेही ते म्हणाले.

माजी आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले, राहुरी विधानसभा मतदारसंघात मी विजयी झाल्यापासून सातत्याने वांबोरी चारी सुरू राहण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महामंडळाकडून 81 टक्के निधी व शेतकरी सहभाग 19 टक्के या प्रमाणे योजना सुरू झाली आहे. यापूर्वी तलाव कसे भरले, योजना कशी सुरू राहिली याची माहिती न घेता काही महाशय आता आपणच पाणी सोडल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. तीन वर्षांच्या काळात काही काम करता आले नाही. ते आपली निष्क्रियता लपविण्यासाठी पत्रकबाजी करतात असे सांगितले.

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाषराव पाटील यांनी काही लोकांना आपली सत्ता गेल्याचे लक्षात नाही. अडीच वर्षात काही दिवे लावता आले नाही. त्यांना आता आम्ही कळ दाबल्याने पोटात कळ येणारच आहे. वांबोरी चारी सुरळीत चालली पाहिजे, असे ते म्हणाले.

वांबोरी चारीचे जनक हे माजी खासदार पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे हे आहेत. यांनी या दुष्काळी भागाचे परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून वांबोरी चारीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. या तालुक्यामध्ये काही लोकांना आपल्या हातून सत्ता गेली याचा विसर पडलेला दिसतोय. त्यांना अजूनही वाटतं आपण सत्तेत आहोत का काय? परंतु सध्या सत्तेत खा.डॉ सुजय विखे हे असून यांच्या नादाला लागू नका, ते विखे आहेत. तुम्हाला काही मदत लागत असेल तर ते मदत जरूर करतील. परंतु, रात्री मदत मागू नका. दिवसा मागा. म्हणजे सर्व जनतेलाही समजेल. आता कळ दाबून पाणी सोडल्यामुळे काहींच्या पोटात दुखेल व ते पुन्हा उद्या डबल कळ दाबायला ही माघार घेणार नाही. कारण आपल्या तालुक्याची डबल उद्घाटन करण्याची परंपरा आहे, असे अ‍ॅड. सुभाष पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी नानासाहेब गागरे, शरद पेरणे, महेंद्र तांबे राजेंद्र उंडे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, सर्जेराव घाडगे, कुलदीप पवार, अनिल आढाव, प्रा. शामराव पटारे, राजेंद्र पटारे, शिवाजी साठे, आशिष बिडकर, नारायण झावरे, दीपक वाबळे, मारुती नालकर, शरद किनकर, प्रभाकर हरिश्चंद्रे, शामराव सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, हनुमंत घोरपडे, मिठू मुळे, शरद मुळे, अनिल पोटे, भैय्या शिंदे, जिजाबापू लोंढे, जब्बार पठाण, अनिल आढाव, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे, सुनील देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : स्पेशल छब्बीसचा कारनामा फसला; पदवीधर तरुण गजाआड

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आमदार तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दुर्गम पेठ तालुक्यातील (Peth Taluka)...