अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आ. संग्राम जगताप यांनी तळमळीने शहराच्या विकासासाठी कोट्यवधींची विकास निधी मंजूर करून आणत आहेत. मात्र, महानगरपालिकेच्या प्रशासनाला व अधिकार्यांना या विकासाशी देणेघेणे नाही. आ. जगताप यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे अथक परिश्रमाने पाठपुरावा करून मंजूर करून आणला. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकारणाचे काम मनपाच्या उदानसीते मुळे रखडले आहे. केवळ नगररचना विभागाच्या एनओसीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणास दिरंगाई होत आहे.
याचा फटका सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना होत असून दररोज त्यांना बसची वाट बघत उन्हाात उभे राहावे लागत आहे. याला महानगरपालिकेचा ढिसाळ व निष्क्रिय कारभार जबाबदार आहे. नगररचना विभागातून दोन दोन महिने फाईल पुढे सरकत नाही; साधी एनओसी अधिकार्यांना देता येत नाही. हा अत्यंत निंदनीय व अक्षम्य प्रकार आहे, असा संताप माजी उपमहापौर भोसले यांनी व्यक्त केला आहे. जर मनपाने दोन दिवसात माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही त्यांनी दिला आहे. भोसले म्हणाले आहेत की, माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीच्या नूतनीकरण निधी मंजूर झाल्याने बस्साथाकाची जुनी इमारत पाडण्यात आली असून नव्या इमारतीच्या कामास त्वरित सुरूवात करण्यात येणार होती.
मात्र, महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उदानसीतेमुळे व नगररचना विभागाच्या बोगस आणि निष्क्रिय कारभारामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांवर आणि आमदारांच्या अथक मेहनतीवर असे पाणी फिरवणे योग्य आहे का ? महानगरपालिकेची यंत्रणा जर अशीच चालणार असेल, तर मग विकासाच्या नावाखाली जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचं ? मनपाच्या नगररचना विभागातील बोगस कारभार योग्य आहे का ? काम न करणार्या अधिकार्यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे ? असे सवाल भोसले यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.