Tuesday, May 20, 2025
Homeनगरनवविवाहितेचा सासरी हुंड्यासाठी छळ

नवविवाहितेचा सासरी हुंड्यासाठी छळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

डॉक्टर पतीची बहीण (नणंद) तसेच पतीचे मामा आणि मामी यांच्याविरुद्ध नवविवाहिता अश्विनी विकास लवांडे उर्फ अश्विनी आदिनाथ हारदे (रा. राहुरी) यांनी सासरी हुंड्यासाठी पैसे व दागिने आणावे म्हणून छळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत गुन्हा व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातून पती डॉ.विकास लवांडे व्यतिरिक्त तिघांवरील गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

डॉक्टर पत्नी अश्विनी विकास लवांडे उर्फ अश्विनी आदिनाथ हारदे (रा. राहुरी) हिने कारेगाव ता. श्रीरामपूर येथील रहिवासी पती डॉ. विकास विश्वनाथ लवांडे तसेच त्यांची बहीण पुनम लवांडे, मामा किशोर दौंड आणि मामी प्रमिला दौंड यांचे विरोधात तिला क्रूर वागणूक दिली, छळ केला, बेकायदेशीर हुंड्याची मागणी केली, मारहाण केली, शिवीगाळ केली आणि ती अपशकुनी आहे, अशा स्वरूपाचे आरोप करून त्यांच्याविरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे कलम 498 अ, 406, 323, 504 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन त्यामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या चारही अर्जदारांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांच्या विरोधात केलेली केस ही कुठल्याही पुराव्याशिवाय व खोटी केली आहे व ती रद्द करण्यात यावी म्हणून अर्जदारांनी अ‍ॅड. नीलिमा खर्डे यांचेमार्फत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने पती डॉ. विकास लवांडे वगळता त्यांची बहीण, मामा व मामी यांचेवरील गुन्हा रद्द केला.

सदरचा निर्णय देताना न्यायालयाने अर्जदार आरोपींच्यावतीने अ‍ॅड. नीलिमा खर्डे व अ‍ॅड. प्रकाश शिरसाठ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पतीची बहीण व मामा-मामी यांच्यावर केलेले आरोप व दोषारोप पत्रांमधील पुरावा याचे अवलोकन केले असता, तो आहे तसा ग्राह्य धरल्यास देखील त्यांचे विरोधात गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असे मत नोंदवले.

तसेच मामा व मामी हे देखील दुसर्‍या ठिकाणचे रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध केलेले आरोप हे सिद्ध होत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. त्यापुढे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा दाखला देऊन सदरहू अर्जदारांच्या विरोधात असलेली केसही रद्द केली व त्यातून या अर्जदारांची मुक्तता केली. अर्जदार आरोपींच्यावतीने अ‍ॅड. नीलिमा खर्डे व अ‍ॅड. प्रकाश शिरसाट यांनी काम पाहिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहुल

“राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर…”; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि...