Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhaava Movie : "महाराष्ट्राला कायम गद्दारीने.."; 'छावा' चित्रपट बघितल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

Chhaava Movie : “महाराष्ट्राला कायम गद्दारीने..”; ‘छावा’ चित्रपट बघितल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) शुक्रवारी (दि.१४) रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनीही हा चित्रपट पाहिला असून त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,”छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्याचा आलेख असलेला ‘छावा’ सिनेमा आताच पाहिला. विकी कौशलचा अप्रतिम अभिनय, कलाकारांची उत्कृष्ट निवड, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रिकरण, पटकथा-संवाद यामुळे हा सिनेमा खरंच छान झाला आहे. एक मात्र सत्य या सिनेमात दाखवलंय ते म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब कधीच हरवू शकला नसता, असे ते म्हणाले आहेत.

तसेच पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की,” महाराष्ट्राला (Maharashtra) लागलेला शाप तेव्हाही जिवंत होता; तो म्हणजे गद्दारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर सातत्याने गद्दारी होत गेली ती छत्रपती संभाजी महाराजांच्या मरणापर्यंत! एकाही युद्धात औरंगजेब त्यांना हरवू शकला नाही. पण, अखेरीस स्वकियांनीच घात केला अन् संगमेश्वरला ते पकडले गेले. तिथे जर घात झाला नसता तर संगमेश्वरहून त्यांनी अकलूजला औरंगजेबाच्या छावणीवर चाल करून गेले असते अन् औरंगजेबाचा पराभव केला असता आणि महाराष्ट्राचा इतिहास (History) बदलला असता. पण, महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिला आहे की दुहीचे बिजे इथे पाषाणावरही उगवतात”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

पहिल्या दिवशी ३१ कोटींची कमाई

‘छावा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी घवघवीत यश मिळाल्यामुळे तो इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच तो बजेटची रक्कम वसूल करेल, असे दिसून येत आहे. दुसरीकडे अभिनेता विकी कौशलचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा ‘छावा’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यापूर्वी त्याच्या ‘उरी आणि बॅड न्यूज’ या चित्रपटाने अनुक्रमे ९ आणि ८ कोटींची कमाई केली होती. मात्र ‘छावा’ने त्याच्या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडल्याचे दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...