Saturday, January 24, 2026
HomeनगरSangamner : टँकरची मागणी होताच तात्काळ टँकर उपलब्ध करून द्या

Sangamner : टँकरची मागणी होताच तात्काळ टँकर उपलब्ध करून द्या

संगमनेर टंचाई आढावा बैठकीत आ.अमोल खताळ यांचे अधिकार्‍यांना निर्देश

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहेत .त्यामुळे ज्या गावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होईल त्या गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवना मध्ये आ. अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube video player

आ. खताळ म्हणाले, सध्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर कसा उपलब्ध करून देता येईल, याची ग्रामसेवक व तलाठी यांनी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर कुठल्या गावात कितीवेळा जातात? किती खेपा होतात? याबाबतचा अहवाल तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना द्या. त्यांच्याकडून माझ्या कडे येईल. अधिकार्‍यांनी गावातील कुठल्याही राजकीय गटातटात अडकून न पडता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. जर कोणी पिण्याच्या पाण्यामध्ये राजकारण करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणचा सर्वे करून त्या गावासाठी किंवा वाडीसाठी तत्काळ टँकर उपलब्ध करून देता येईल याची दक्षता घ्यावी. ज्या गावात कमी लोकसंख्या आहे, त्या गावात लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून मदत करण्याची भावना ठेवा. तुम्हाला आमचे कार्यकर्ते जर त्रास देत असेल तर त्यांची तक्रार माझ्याकडे करा. परंतु तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी आ. खताळ यांनी अधिकार्‍यांना दिली.

संगमनेर तालुक्यात पूर्ण दाबाने विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे महावितरणच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर, भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे, भाजपचे रउफ शेख, महेश मांडेकर, गुलाब भोसले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, रोहिदास गुंजाळ, अमोल दिघे, शरद गोर्डे, शंकर वाळे, गणेश सोनवणे, दिनेश फटांगरे, अण्णासाहेब ननावरे, नामदेव घुले यांनी यावेळी आ. खताळ यांच्या समोर महावितरण विभागाच्या अनेक तक्रारी केल्या. त्यानंतर लवकरात आपण महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची महावितरणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, असे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.

गेली 40 वर्षापासून या तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा लागला आहे. आता तालुक्यात परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आपला संघर्ष कमी होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने जनतेशी उद्धटपणे न वागता सौजन्याने वागा. जर काम होत नसेल तर वरिष्ठांना सांगून बदली करून घ्या. विशेषत: महावितरणच्या संदर्भातील तक्रारी घेऊन आलेल्या जनतेच्या तक्रारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हे शेतकर्‍यांशी व्यवस्थित बोलत नाही. त्यांनी जर आपल्या कामात सुधारणा केली नाही तर त्यांची थेट गडचिरोलीला बदली केली जाईल.
– आ. अमोल खताळ

ताज्या बातम्या

Nashik Crime : खुनाच्या गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत लोखंडी रॉडने मारहाण करून खून करणाऱ्यांना चौघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप...