Saturday, June 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMNS-ShivsenaUBT Alliance: दोन दशकात जे घडले नाही ते आज घडले; 'सामना'च्या मुखपृष्ठावर...

MNS-ShivsenaUBT Alliance: दोन दशकात जे घडले नाही ते आज घडले; ‘सामना’च्या मुखपृष्ठावर राज-उध्दवचा एकत्र फोटो, काय म्हंटले बातमीत?

मुंबई | Mumbai
मनसे आणि शिवसेना उबाठा गट एकत्र येणार का? यासंदर्भात माजी उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी ‘मातोश्री’वरील पत्रकार परिषदेत केलेल्या सूचक विधानावरुन राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा मोठ्या निर्णयाची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते असे म्हटले जात आहे. शुक्रवारी मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावे असे म्हंटले आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठे वक्तव्य केले. जे जनतेच्या मनात ते होईल असे म्हणत, आता थेट बातमीच देऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडत नवीन पक्षाची म्हणजेच मनसेची स्थापना केल्याची घोषणा केली. तेव्हापासूनच आजपर्यंत म्हणजेच १९ वर्षांमध्ये जे घडले नाही ते चित्र आज ‘सामना’त पाहायला मिळाले. आज मोठ्या कालावधीनंतर ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो सामनात बघायला मिळाला.

आजच्या ‘सामना’च्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे. १९ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोसह उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही…बातमीच देतो…महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले…सूर जुळणार! उत्सुकता वाढली, असेही म्हटले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?
शुक्रवारी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडला. या वेळी उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शिवसेना-मनसे युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल,” असे सूचक विधान केले. याच विषयावर अधिक भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी, “मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन,” असे उध्दव ठाकरेंनी म्हटले.

१९ वर्षांत पहिल्यांदाच…
उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात सकारात्मक संदेश दिल्याचे वृत्त ‘सामना’मध्ये छापून आले आहे. मात्र हे वृत्त छापताना ‘सामना’च्या मुख्य मथळ्याखालीच उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची बातमी झळकली आहे. मात्र या बातमीच्या फोटोने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बातमीसाठी राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या शेजारी बसून हितगुज करतानाचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोत उद्धव राज ठाकरेंना काहीतरी सांगत असल्याचे दिसतेय. शिवसेनेमधून बाहेर पडून मनसेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरेंचा मागील १९ वर्षांमध्ये म्हणजेच जवळपास दोन दशकांमध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच ‘सामना’च्या मुख्य बातमीला आणि तो ही एवढा मोठा फोटो छापण्यात आला आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. हा फोटो म्हणजे दोन्ही नेत्यांमधील चर्चा सकारात्मक सुरु असल्याचा संदेश असल्याचे बोलले जात आहे.

मनसेत बैठकांचे सत्र
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवारी ७ जून) तातडीची बैठक बोलवली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मनसेच्या सर्व उपाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत ठाकरे गटासोबत केल्या जाणाऱ्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय अशाप्रकारे युती झाली तर मनसेने नेमकी कशी भूमिका घ्यायची, याचे मार्गदर्शन देखील राज ठाकरे करू शकतात.

युतीवर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया
ठाकरे-मनसे युतीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली होती. युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावे. राज ठाकरे हे १०० पावले पुढे येतील असा विश्वास मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. युती ही काही एक दिवसात होत नाही. ही एक प्रक्रिया असते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच राज ठाकरे करतील हे नक्की, असे अविनाश जाधव म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Corona Virus : सावधान! करोना वाढवतोय टेन्शन; भारतात रुग्णांची संख्या ५०००...

0
दिल्ली । Delhi भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (६ जून) देशभरात ५,००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद...