राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणीसाठ्याने 19 हजार दलघफू चा टप्पा गाठल्याने धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणात काल सायंकाळी 18 हजार 917 दलघफू (72.75 टक्के) पाणीसाठा झाला होता. तसेच धरणात 3 हजार 822 क्युसेसची कोतूळकडून आवक सुरू होती.
- Advertisement -
गेल्या 24 तासात धरणात 369 दलघफू पाणी जमा झाले. सध्या धरणातून नदीपात्रातील विसर्ग बंद केला असून उजवा कालव्यातून 500 क्युसेस तर डावा कालव्यातून 150 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. धरण परिचलन सुचीनुसार जर धरणात 31 जुलै पर्यंत 21 हजार 809 म्हणजे 83.91 टक्के पाणीसाठा झाला तर पुन्हा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे.





