मुंबई | Mumbai
मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुलीने वडीलांच्या इच्छेविरोधात दुसऱ्याच धर्मातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याने नराधम बापाने कट रचून त्यांना मुंबईत बोलावून मुलीचा गळा आवळून आणि डोके दडगाने ठेचून खून केला. तर जवायचा गळा चिरून हत्या केली.
Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वरील १२ जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार; भर रस्त्यात ट्रक थांबवल्याचा VIDEO समोर
या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी आरोपी बापासह त्याचा मुलगा आणि एका तरुणाला अटक केली असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. करण चौरसिया (वय २२) आणि गुलनाज (वय २०) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर वडील गोरा खान, त्याचा मुलगा सलमान आणि सलमानचा मित्र कैफ खान यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
गोवंडी परिसरात १४ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी, ट्रॉम्बे, टिळकनगर, चेंबूर व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली.
चर्चा तर होणारच! अजित दादांच्या बॅनरवर झळकला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो
तपासादरम्यान हा मृतदेह उत्तर प्रदेश येथील रहिवासी करण चंद्र याचा असल्याचे निष्पन्न झाले. करणची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान करण आणि गुलनाज खान या दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समजले. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. संशयावरून पोलिसांनी गुलनाजचे वडील गोरा रईमुद्दीन खान यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान खान यांनी मुलगा सलमान आणि चार जणांच्या मदतीने करणची हत्या केल्याची कबुली दिली.
करणच्या हत्येनंतर गुलनाजचादेखील काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे तिच्या बाबतीतही वडील आणि भावाकडे कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या उलटसुलट प्रश्नांपुढे बापलेकाचे पितळ उघड झाले. गुलनाज हिची हत्या करून तिचा मृतदेह नवी मुंबई येथे फेकल्याची माहिती दोघांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी नवी मुंबईत जाऊन गुलनाजचा मृतदेह ताब्यात घेतला. हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गोरा रईमुद्दीन खान, त्याचा मुलगा सलमान, मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक केली; तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे बापलेकांनी सांगितले.
मोठी दुर्घटना! नगर-आष्टी रेल्वेला भीषण आग