Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने 'ही' याचिका फेटाळली

राज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ‘ही’ याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या (Change of Name) निर्णयाला काही स्थानिकांनी विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने स्थानिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामांतर करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. पंरतु, या नामांतराला काही स्थानिकांनी विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये या निर्णयावर सुनावणी (Hearing) होऊन न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आज न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करत स्थानिकांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

दरम्यान, यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारने शहरांच्या नामांतराबाबत घेतलेला निर्णय महसूल विभागाकरीता (Revenue Department) असल्याने यामुळे कोणाचे कुठलेही नुकसान होणार नाही, असे म्हटले. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale : “मुख्यमंत्री अन् सरकार बोळ्याने…”; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर,...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन (Waghya Statue) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज ...