Thursday, May 1, 2025
Homeक्राईमNashik News : मृतदेह शोधासाठी काढल्या पाणवेली; रामकुंडात बीडचा तरूण बुडाला

Nashik News : मृतदेह शोधासाठी काढल्या पाणवेली; रामकुंडात बीडचा तरूण बुडाला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवदर्शनासाठी कुटुंबासह नाशिकच्या (Nashik) रामकुंड (Ramkund) येथे आलेल्या बीडमधील तरुणाचा आवर्तनाच्या प्रवाहित पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि. २९) रात्री घडली. दरम्यान, बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाने शोधमोहीम राबविली असता, बुडून बेपत्ता झालेल्या बालाजी रामभाऊ मुळे (वय २७, रा. राडी, ता. आंबेजोगई, जि. बीड) या तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजता केवड़ीबन भागा-तील नदीपात्रातील पाणवेलीत अडकल्याचे आढळून आले. या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

गंगापूर धरणातून गोदावरी नदीसह (Godavari River) कालवे, शेती व एकलहरे पॉवर स्टेशनसाठी १० ते ११ मेपर्यंत अतिरिक्त एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग टप्याटप्प्याने सुरु आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तो प्रवाहित झाली आहे. दरम्यान, गोदापात्रात पाणवेली (Panveli) वाढल्या असून, प्रवाहित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून येत आहेत असे असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या बालाजी मुळे व कुटुंबाने मंगळवारी वणी आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

त्यानंतर ते सायंकाळी सात वाजता पंचवटीतील (Panchvati) रामकुंड भागात आले. रात्री साडेसात ते आठ वाजता गोदाआरती झाल्यावर कुटुंबाने पाण्यात दिवे सोडले. याचवेळी पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने बालाजी येथील बाणेश्वर मंदिराजवळील पात्रात घसरून पडला, पाणी प्रवाहित असल्याने तो बुडाला. यानंतर कुटुंबाने आरडाओरड केली. यंत्रणेने शोधाशोध केली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यातच, घटनेची माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी नाशिक येथील महेश शेळके यांना कळविली. महेश यांनी यंत्रणेशी समन्वय साधल्यावर शोधमोहिमेस वेग आला.

गोदावरी दुथडी वाहू लागली

गंगापूर धरणातून पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने सायंकाळी गोदाकाठी फिरणाऱ्यांनाही त्याचा आनंद मिळत आहे. धरणातून काही शेतीसाठी व काही एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाणी राखीव असत्ते. ते ठराविक वेळी सोडले जाते. ते राखीव एक हजार क्यूसेक पाणी काल सोडले गेल्याने गोदावरी वाहू लागली आहे. पाण्याअभावी येथे पाणवेली मोतथा प्रमाणात वाढल्या होत्या. आज त्या वाहत्या पाण्यामुळे वाहून गेल्या.

आता लोकांनाच उठाव करावा लागणार – जानी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले गेलेले नाही. नागील दहा वर्षापासून ‘बहा-बिस्कीट’ समिती विकासाचा देखावा करीत आहे. नदीला मूर्ख बनवले, जनतेला मूर्ख बनवले, केवळ कागदपत्र रंगवली. पाणवेळी नदीमात्रात तयार होताराच कशा? मनपाकडे स्कीगर नाही, रोबोटिक यंत्र आणले होते तेही दिसत नाहै, पानवेली काढणार कशा? आतापर्यंत लोकांच्या आरोग्याचा प्रश् निर्माण होत होता. आता पा पाणवेलींमुळे लोकांच्या जीवावर बेतायला लागले आहे. त्यामुळे आता लोकांनाच उठाव करावा लागणार आहे.

देवांग जानी, गोदावरीप्रेमी

पोहायला जाणे बेतले?

घटनेनंतर, बुधवारी सकाळी आठ वाजता अधिशमनच्या पंचवटी उपकेंद्र व शिंगाडा तलाव येथील प्रत्येकी एका बंबासह जवानांनी स्बरी बोटीतून वगळ टाकून बालाजी मुळेच्या गृतदेहाचा शोध घेतला. मात्र, अपयश येत असतानाच अत्रिशगन दलाला तपोवनालगतच्या केवडीबनातील उतारावरील नदीपात्रात असलेल्या पाणवेलीत बालाजीच मृतदेह आढळून आला. तेव्हा बालाजीच्या अंगावर अंतरवखाव्यतिरिक्त इत्तर कपड़े नव्हते. त्यामुळे तो नोहण्याच्या बेतात पाण्यात उतरला होता, व्यातून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे पोलीस व अग्रिशमन दलाने सांगितले. पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन संजय कानडे, संजय जाधव, बाळासाहेब महोगे, अशोक सरोदे यांनी गोदाकाठ गाठून शोधकार्य केले तसेच शिंगाडा तलाव मुख्यालयातूनही रबरी बोट घेऊन फायस्मन उदय शिर्के, नितीन म्हस्के, किशोर पाटील, संजय आगलावे आणि प्रशिक्षणार्थी जवान यांनी जुन्या कन्नमवार पुल ते तपोवनपर्यंत शोधगोहीम राबविली.

मनपाचे पाणवेलीकडे दुर्लक्ष

गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी वापरले जाणारे ट्रॅश स्किमर यंत्र पाच वर्षांनंतर स्मार्ट सिटीकडून महापालिकेला मिळाले आहे. मात्र, ते यंत्र सध्या काम करीत नसून त्याला ऑपरेटरच मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ट्रॅश स्किमर यंत्र खरेदी केले होते. कंपनीने पाच वर्षे ते चालविण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एका कंपनीवर सोपवली होती. मध्यंतरी हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेकडे हस्तांतरीत केले असून आधीच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. पाच वर्षे ते चालविणे आणि देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण दोन कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रॅश स्किमर यंत्राने आजवर गोदापात्र पूर्णपणे पाणवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे दुर्घटना देखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुद्दे

गाडगे महाराज पुलाखालील पात्रातून पाणवेली हटविल्या
दोन तासांत तब्बल एक ते दीड टन पाणवेली काढल्या
पुलाखालील रस्ता बॅरिकेडिंग करुन केला बंद
मृत वालाजी हा मेन्स पार्लरमध्ये काम करत होता
आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा झाला पोरका

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे...

0
मुंबई | Mumbai अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार (30 एप्रिल) रोजी होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा...