Thursday, May 15, 2025
HomeनाशिकNashik News : अखेर मांजरपाड्याचे पाणी पोहोचले; फटाक्यांची आतषबाजी करत येवल्यात जलपूजन

Nashik News : अखेर मांजरपाड्याचे पाणी पोहोचले; फटाक्यांची आतषबाजी करत येवल्यात जलपूजन

येवला | प्रतिनिधी | Yeola 

- Advertisement -

तालुक्यात अखेर पुणेगाव -दरसवाडी -डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी (Water) पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत पाण्याचे जलपूजन करण्यात आले. 

हे देखील वाचा : Nashik News : संततधारेने घरांची पडझड; दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू

काल, दरसवाडी धरणातून (Darswadi Dam) ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यानंतर केवळ १५ तासात आज हे पाणी येवला तालुक्यातील (Yeola Taluka) कातरणी शिवारात पोहोचले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कालव्यात उतरून आनंदोत्सव साजरा केला. येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून येणारे पाणी येवल्याला पोहोचविण्यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे.  

हे देखील वाचा : Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

दरम्यान, यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार,दत्ता निकम,अलकेश कासलीवाल, एल.जी.कदम, बाळासाहेब गुंड ,नवनाथ काळे,मच्छिंद्र थोरात, तुळशीराम कोकाटे, मकरंद सोनवणे,शिवाजी कदम, समाधान कदम, पप्पू सोनवणे, दिपक कदम, प्रवीण कदम, दत्तू लभडे, गोकुळ शिंदे, सचिन कदम, बापू सोनवणे, विनायक कदम, नामदेव पगार, विठ्ठल कदम,भगवान ठोंबरे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विजय जेजुकर,कैलास जेजूरकर,नवनाथ थोरात,दिपक गायकवाड, दिपक पवार,संदीप कदम, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ॲड. मंगेश जाधव, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...