Tuesday, May 20, 2025
Homeनाशिकना मंडप…ना बँड बाजा बारात; काटवणात चार जणांच्या उपस्थितीत उरकला विवाह…

ना मंडप…ना बँड बाजा बारात; काटवणात चार जणांच्या उपस्थितीत उरकला विवाह…

विराणे | वार्ताहर 

- Advertisement -

ना मंगल कार्यालय… ना अलिशान मंडप.. ना बँड बाजा बाराती.. ना जेवणाच्या पंगती.. ना वरमाया ना करवल्या. अस म्हटल की विवाह कसा होईल? परंतु विराणे येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पगार यांची मुलगी गायत्री व टेहेरे येथील प्रगतशील शेतकरी तुळशिराम शेवाळे यांचे सुपुत्र नंदकिशोर यांचा विवाह अगदी चार लोकांत अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला.

सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धूमाकूळ घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण समारंभांवर देखील बंधन आली आहेत.

याचा परिणाम लग्न समारंभ देखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले.

परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत पगार व शेवाळे परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.

या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना न आमंत्रण देता वधू व वराच्या आई वडीलांनीच पार पाडला. दोन्ही परिवारात मुलगी व मुलगा एकटे असूनही झगमटाला आवर घातला.

अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून संपूर्ण काटवण परिसरात एकच चर्चा आहे, “एक विवाह ऐसा भी।”

विवाहची तारीख पूर्वीच ठरलेली होती. संचारबंदी असल्याने विवाह पुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला. शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेला फाटा देऊन निर्णय घेतला.

– शांताराम पगार, वधू पिता, विराणे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...