नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य शासनातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहोत. मात्रा नाशिकमध्ये ‘शासन रामदरबारी आले आहे. जे राज्य काम करते ते रामराज्य असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Shasan Aaplya Dari : गोदावरीला प्रदूषणमुक्त करणार – अजित पवार
कधी चांगलं काम केलं तरी काहींना पोटदुखी असते. पोटदुखीवर औषध म्हणून डॉ. शिंदे आणले आहे. आता आपल्याला तीन झेंडे घेऊन पुढे जायचे आहे. आधीचे सीएम बोलायचे की त्यांना काही समजायचं नाही, पण आम्हाला सर्व खात्यातील सर्व समजते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.
“आमच्या पिढीतला एकमेव…”; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ झाले भावुक
ते पुढे म्हणाले की, या सरकारने गुंतवणुकीत महाराष्ट्राला एक नंबर केले. गती वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता जे निर्णय होतील ते सर्वसामान्यांसाठी होतील. आम्ही प्रत्येक गावात अॅग्री बिझनेस सोसायटी बनवणार आहे. बिझनेस सोसायटीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. यात कोल्ड स्टोरेजची सोयदेखील असणार आहे. तसेच आमच्या योजनांमुळे महिलांनादेखील फायदा होत आहे. हे सरकार सामान्य माणसासाठी कटिबद्ध असून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
शरद पवार की अजित पवार? आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केली भूमिका, म्हणाल्या…