Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूज"…म्हणून वेळीच खबरदारी घ्या"; संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र

“…म्हणून वेळीच खबरदारी घ्या”; संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र

मुंबई । Mumbai

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महिना लोटला तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही. एक आरोपी अद्याप फरार असून अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी बीडमध्ये भव्य मोर्चे निघाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरतेय.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि त्यांना राज्य सरकारमार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शरद पवारांचे पत्र जसेच्या तसे…

मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच श्री. संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहऱण करुन निर्घृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारुन क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आऱोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्य पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोणावने यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी अशणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रासरमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.

संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमूळे खणून काढावीत अशी देशील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरुन जनतेला संभोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलिस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...