Saturday, July 27, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद - ना. विखे

निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद – ना. विखे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाल्याने धरणाच्या लाभक्षेत्रात शेतकर्‍यांना शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

निळवंडे प्रकल्पाच्या जल नियोजनानुसार धरणातील 8 टीएमसी मधील पाणी साठ्यापैकी 6.50 टीएमसी पाण्याच्या साठ्यातून 68 हजार 878 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र एवढे मोठे क्षेत्र पारंपरिक पध्दतीने भिजविणे आव्हानात्मक असल्याने कालव्यांचे अस्तरीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर करण्यात आला. त्यानुसार खुल्या कालव्यांसाठी आवश्यक असलेल्या अस्तरीकरणाच्या नियोजनाचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अस्तरीकरणाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून 450 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही झाल्याने खुल्या कालव्यांचे अस्तरीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पासाठी अस्तरीकरणाची एकच निवीदा मंजूर केल्यास कामे वेळेवर होणार नाहीत यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या सुचनेनुसार संपूर्ण प्रकल्पावरील अस्तरीकरणाचे पाच भागात विभाजन करण्यात आले असून, याबाबतच्या पाच स्वतंत्र निवीदाही प्रसिध्द झाल्या आहे. अस्तरीकरणाचे कामही विहीत वेळेत पूर्ण करून, लाभक्षेत्रात शेतकर्‍यांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन सुरू केले आहे. निळवंडे प्रकल्पाच्या कोणत्याही कामास निधीची अडचण भासणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या