Friday, May 16, 2025
Homeजळगावएकच फाईट, वातावरण टाईट!

एकच फाईट, वातावरण टाईट!

जळगाव jalgaon।

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्यांनतर (Transition to power in the state) शिवसेनेत दोन गट (Two factions in Shiv Sena)पडले. विरोधकांवर हल्लाबोल (Attack opponents) करण्यापेक्षा हे दोन्ही गट (Both groups) आपल्याच एककेळच्या सहकार्‍यांचे उणे-दुणे बाहेर (Outside of the minuses of colleagues) काढू लागले. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena of Balasaheb) या दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु असून ठाकरे गटाच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारेंच्या (Firebrand leader Sushma Andhare) दौर्‍याने वातावरण टाईट झाले आहे.

माजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सभा रद्दचे आदेश दिले असल्याने सुषमा अंधारे यांना सभेला मुक्ताईनगर जाण्यापासून रोखले. यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाकडून बंडखोरी करणार्‍या आमदारांचा समाचार घेतला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. ही यात्रा गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दाखल झाली आहे. धरणगाव, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. आज मुक्ताईनगर येथे अंधारे यांची सभा होणार होती. मात्र जिल्हाधिकारी अमन मित्तल कालच सभा रद्दचे आदेश दिले होते.

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

हॉटेलजवळ पोलिसांचा गराडा

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सायंकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा अंधारे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलजवळ तैनात करण्यात आला होता. सुषमा अंधारे ह्या मुक्ताईनगर येथे नियोजीत सभेला जाण्यासाठी निघाल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखले. तुम्हाला सभेला जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्यांना स्थानबध्द केले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राड्यानंतर सुषमा अंधारे बीडला रवाना

सुषमा अंधारे यांनी तीन – चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सभा घेऊन गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या दोन दिवसात जळगावत मोठा राजकीय राडा देखील झाला. जळगावच्या या दौर्‍यानंतर सुषमा अंधारे गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मुक्ताईनगरची सभा रद्द झाल्याने झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारे जळगाव वरून परळीकडे रवाना झाल्या यावेळी सुषमा अंधारे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत व फुलांचा वर्षाव करत सुषमा अंधारे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला.

तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-ना.पाटील कोणत्याही पक्षाला महाप्रबोधन करण्याचा व त्यांच्या नेत्यांना प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार कमी तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार अधिक होत असल्याचा आरोप पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मुक्ताईनगरात महाआरती देखील होणार होती. मात्र, त्या आरतीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याच प्रमाणे इतर सभांना पोलीस, जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शासनाच्या दबावाखाली या सभेची परवानगी नाकारण्यात आली, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील

हा तर सत्तेचा गैरवापर-अंधारे मुक्ताईनगर येथील नियोजित सभेपासून जाण्याला पोलिसांनी रोखल्यामुळे सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, पालकमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. माझा पोलिसांवर राग नसून ते केवळ आदेशाचे पालन करीत आहेत. संविधानाने मला सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. मात्र गुलाबराव पाटील ये डर मुझे अच्छा लगा अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

सुषमा अंधारे

गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...