Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रवडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; म्हणाले...

वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; म्हणाले…

पुणे | प्रतिनिधी

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणातंन जे तोडफोडीचे राजकारण झाले ते राज्यातीलजनतेला अजिबात रुचलेले नाही. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आता उडत चालला आहे, अशी परिस्थिती देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे. काल परवापर्यंत ज्यांना चोर, डाकू म्हणत होते, त्यांच्या टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती पुढे आली काय असे जनतेला वाटत आहे, अशी टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

- Advertisement -

ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, आज जे लोक ज्या पक्षातून बाहेर गेले आहेत, त्याचा त्या पक्षावर परिणाम होईल असे अजिबात वाटत नाही. शिंदे सेनेचे फक्त दोन खासदार निवडून येतील, राष्ट्रवादीचेसुद्धा तेच आहे. भाजपाला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात मोठा आनंद वाटतो आहे की काय असे वाटते आहे.

शिंदे-फडणवीस यांच्यासोबत अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने ताकद वाढणार आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजित पवार आल्याने ताकद वाढली असे म्हणत असतील तर ती ताकद कुणाची भाजप की, अजित पवारांची वाढणार? भाजपाला नाकारले म्हणून अजित पवारांचा वापर करत असेल तर तुमचा अंदाज खोटा ठरणार आहे.

Viral Video: प्रेयसीचा ड्रामा, रागाच्याभरात चढली थेट १५० फुट टॉवरवर; पुढे घडलं असं काही..

आज येताना बोर्ड बघत होतो, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल हा देशाच्या गृहमंत्र्यांपेक्षा मोठा आहे. परंतु, बोर्डावर त्यांचे फोटो कार्यकर्त्यांसारखे खाली लावलेले आहेत. यातूनच वैचारिक ताकदीचे अध:पतन झाले आहे. हे लोक आता तिकडे जाऊन गुलाम होत आहेत. गुलामांच्या लाईनमध्ये जाऊन सगळे बसत आहेत हा माझा आरोप आहे. दहा वर्षे सत्तेत राहून स्वबळावर निवडणूक लढवून सत्तेत येण्याची त्यांची ताकद नाही. जनतेची कामे केली नाही म्हणून पुरोगामी लोकांची गरज वाटत आहे, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.

रेल्वेचा भीषण अपघात; १० डब्बे रुळावरुन घसरले, १५ जणांचा मृत्यू

औरंगजेबच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, औरंगजेबाचे नाव घेऊन ज्याला मते मिळतात तोच औरंगजेब म्हणतो. तर औरंगजेबाला विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात त्यांच्या मुखात एक, पोटात एक आहे. आरएसएसच्या लोकांनी स्वतःच्या मुलांचे नाव कधी शिवाजी महाराज ठेवले नाही.

शिवाजी महाराज यांचा फोटो आरएसएसच्या नागपूर कार्यालयात बघायला मिळाला नाही. त्यामुळे हे मतांचे राजकारण आहे. काहीना शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय मत मिळत नाहीत तर, काहीना औरंगजेबचे उदोउदो केल्याशिवाय जमत नाही. त्यामुळे यांची मिलीभगत आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ जमेल तर वाटून खाऊ आणि राज्यात हिंदू मुस्लिम मतभेत करू, असे लोक सध्या राज्यात दिसत आहेत, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.

“अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..”; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य

भुजबळ आता ओबीसींचे राहिले नाहीत

ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ हे भाजपासोबत गेल्याचे पाहायला मिळत आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, सगळे भाजपासोबत जातील पण भुजबळपण जातील हे कोणालाच वाटले नव्हते. भुजबळ यांच्या तोंडी मोदींचे नाव येईल स्वप्नातही वाटले नव्हते. पण, हे सगळे जे काही आहे ते सतेचे लाचारी आहेत. भुजबळ आता ओबीसींचे राहिले नाहीत. भविष्यात त्यांना राजकीय संकटांचा सामना करावा लागणार आहे, असे देखील यावेळी वडेट्टीवार म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या