Wednesday, June 10, 2026
Home Blog Page 13373

BJP protests against Rahul’s Savarkar remark

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK: The city unit of the BJP on Monday held a demonstration in front of District Collectorate here to protest Congress leader Rahul Gandhi’s comment on Hindutva icon Veer Savarkar. Demanding Rahul’s apology over his remarks, the BJP workers submitted a memorandum to resident dy district collector Bhagwat Doiphode in presence of state unit secretary Laxman Savji, city president Girish Palve, Suresh Patil, former standing committee chairperson Himgouri Adke, Bharati Bagul and Sujata Karajgikar among others.

“Veer Savarkar, a great revolutionist has sacrificed his life for the sake of nation. However due to lack of knowledge, Rahul Gandhi is making false statements. He must apologise for his misleading remarks,” the memorandum added. As part of its naation-wide agitation, the party workers raised slogans criticising Gandhi and hailing Veer Savarkar.

They beaten up the banner of Rahul with shoes. Meanwhile, the police are contemplating on registering a complaint against the agitating BJP workers as Section 144 has already been imposed in the collectorate area due to ongoing work of the Smart Road.

The police claimed that the party workers have violated Sec. 144 and hence they are liable for charges to be framed.
With the imposition of Sec. 144, all political parties, social outfits have been banned to hold agitation of any nature within the restricted area.

नाशिक : निवेकचे जलतरणपटू राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिकमधील निवेकच्या जलतरण पटूंनी कौतुकास्पद कामगिरी केली.

या स्पर्धेत एकूण ९५० पेक्षा अधिक खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलींच्या गटात इयाना पटेल हिने ५०० मीटर अंतर ४ : ३: ७५ मिनिटात हे अंतर पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला.

१२ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रिया जोशी हिने २ किलोमीटर अंतर २४ : ५८ : ०४ मिनिटात पूर्ण करून नववा क्रमांक मिळवला. १२ वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य कुवर याने २ किलोमीटर अंतर २३ : ४२ : ३२ मिनिटात पूर्ण केले. आदित्य या गटात २३ वा आला.

याच वयोगटात हेच अंतर जयकुमार याने ३६ : २२ :  ९८ मिनिटात पूर्ण करत ४३ वा येण्याचा मान मिळवला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस दीक्षितने ३ किमी अंतर ३७ : ११ : ०० मिनिटात पूर्ण करून १९ वा क्रमांक मिळवला.

निवेकच्या सर्व जलतरणपटूंना राष्ट्रीय प्रशिक्षक हिरेन बुझरुक यांचे मार्गदर्शन लाभले. निवेकच्या जलतरणपटूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून सर्व खेळाडूंचे अभिनंदन निवेक कमिटी सदस्यांनी केले आहे.

शब्दगंध : बदलांमुळे आनंदी झाले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

काही वर्षांपूर्वीची मी आणि आताची मी, काय चांगले बदल झाले माझ्यात? अगदी सहज विचार मनात आला. आपण अनुभवातून शिकणारी, समजणारी माणसे. प्रत्येक प्रसंग, अनुभव हा आपल्याला खूप काही देऊन जातो आणि हे फक्त आपल्या हातात आहे की त्या अनुभवाचे सोने करायचे की माती.

आपला केलेला अपमान, मिळालेले नकार, झालेली फसवणूक हे असे इंधन असते ज्यामुळे आपल्यातल्या निद्रिस्त ठिणगीला जागृत करायचे असते. एकदा ती पेटून उठली की आपल्यातले सगळ्यात बेस्ट आपण द्यायचे आणि त्यातून काहीतरी नावीन्यपूर्ण क्रिएशन घडवायचे असते. स्वतःलाच स्वतः चे काहीतरी नवीन उमगलेले असते. आपल्या प्रगतीच्या मार्गात आपल्याला नावे ठेवणारी लोकंही आपले मार्गदर्शक असतात म्हणून त्यांचे आभार मानायचे आणि पुढे चालायचे.

मागच्या काही वर्षांत हेच प्रामुख्याने शिकले. कृतज्ञता व्यक्त करणे. आयुष्याकडे कृतज्ञतेने बघता येऊ लागले. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रॉब्लेम्सकडे बघितले की आपण खूप सुखी आहोत, याची जाणीव होते. आपल्याला मिळालेले धडधाकट शरीर, विचार करणारे मन, बुद्धी, चिकाटी, सहनशक्ती या जोरावर आपणही यशस्वी होऊ शकतो. माझी सद्गुरुंवरची श्रद्धा अजून दृढ होऊ लागली. कारण जे माझ्याकरिता सर्वोत्तम आहे तेच मला ते देताहेत याची पूर्ण खात्री मला होऊ लागली.

ज्यांना खरेच आपले मानले होते अशा आपल्याशी वाईट वागलेल्या लोकांना माफ करायला शिकले. समोरचा माणूस असा वागला म्हणून मीही तसेच वागले पाहिजे ही विचारधारा बदलावीशी वाटली. कारण यात फक्त वेळ जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणून त्यांची माफीही मागितली आणि त्यांना माफही केले. आधी खूप राग यायचा, खूप ओव्हर रिअ‍ॅक्ट व्हायचे. आता राग येत नाही असे नाही पण तो काही क्षणात विसरून जाते. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि ते आता जमायला लागले. यात रेकी साधनेचे मी खूप आभार मानीन. शांत राहून, संयम बाळगून सकारात्मक राहायला मला रेकीची खूप मदत होते.

मुख्य म्हणजे वेळेचे महत्त्व समजायला लागले. जे वाटतेय ते लगेच करून मोकळे व्हा मग ते नाटक, सिनेमा बघणे असो, पुस्तक वाचन असो, प्रवास असो. हा क्षण महत्त्वाचा. अगदी आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हायचे असेल, संवाद साधायचा असेल तर ते सांगून मोकळे व्हा. जवळच्या माणसांबद्दल वाटणारा जिव्हाळा व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे हे आता उमगलेय. मग ते आपले मित्र- मैत्रिणी असो किंवा आपली आवडती व्यक्ती. त्यांना समजून घेता येऊ लागले. प्रत्येक गोष्ट माझ्याच मानाप्रमाणे होईल हा आग्रह सोडून द्यायला शिकले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षांचे ओझे कमी करून, तक्रारींना जागा न देता आनंदी राहायला शिकले. एकदा का आपण आनंदी राहायला शिकलो की येणारे विचारही खूप सकारात्मक असतात. जाणीवपूर्वक नकारात्मक विचारांना बाजूला ठेऊन अखंड सकारात्मकतेची ऊर्जा मनात जागृत ठेवायची. कारण जे माझ्याजवळ आहे तेच मी सर्वांना देऊ शकते. हाच आनंद, हेच प्रेम सगळ्यांना देऊन ते द्विगुणित करू शकते.

-वैशाली गुडी

प्रभाग पद्धती, थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीवर गदा येण्याची शक्यता

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही?; भाजपाच्या निर्णयाला ‘ठाकरे सरकार’चा दे धक्का

नागपूर | वृत्तसंस्था 

मेट्रो, बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिल्यानंतर आता ठाकरे सरकार फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे.

थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाली होती. दरम्यान, याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले असून या निर्णयाला स्थगिती मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पूर्वी ग्रामपंचायत सदस्य सरपंचाची निवड करायचे तर नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांकडून नगराध्यक्षांची निवड केली जायची.

मात्र फडणवीस सरकारकडून ही पद्धत बंद करून थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याची पद्धत सुरू केली आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक यांना अधिकार नसल्यासारखे चित्र आहे.

मात्र आता ही पद्धत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून बंद केली जाणार आहे. यासोबतच मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभागांची पद्धत देखील रद्द केली जाणार असलायचे प्राथमिक वृत्त आहे.

आधी सारखीच एक प्रभाग एक पद्धत लागू करण्याच्या दृष्टीनं नव्या सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. जनतेमधून सरपंच, नगराध्यक्षांची निवड आणि नगरपालिकांमध्ये चार प्रभागांची पद्धत हे दोन्ही निर्णय भाजप सरकारनं घेतले होते.

मात्र आता महाविकास आघाडी हे दोन्ही निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची, मात्र नगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा अशी अवस्था आहे. त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतो. याच कारणामुळे हे दोन्ही निर्णय रद्द केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

शब्दगंध : सक्षमतेतून आत्मशांतीकडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शाळा आणि कॉलेजमधील मुलींचे प्रश्न हाताळताना त्यांच्या विविध प्रकारच्या असुरक्षितता समोर येतात. अगदी घरापासून सभोवताल ते समाजापर्यंत. घरामध्ये मुलींच्या भावना समजून न घेणे, तुलना करणे, दुर्लक्ष करणे, आज्ञाधारक असणे ही अपेक्षा ठेवणे हे सर्रास दिसते. घराबाहेर, सभोवताली, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी इत्यादी सोबत येणारे नातेसंबंधातील भावनिक ताणतणाव, शारीरिक सुरक्षिततेचा तणाव, अभ्यासाचा तणाव अशा अनेक तणावांना मुले सामोरे जातात. तसेच तुम्ही वागायला पण चांगले पाहिजे, तुम्ही पुढे पाहिजे, एक नंबर पाहिजे, सर्वगुणसंपन्न हवे याचाही तणाव असतो. करिअर करण्याचा तणाव, आयुष्यामध्ये काय बनायचे याचा तणाव असतो. ज्या मुली अजून 18 वर्षांच्या होऊन सज्ञानही झाल्या नाहीत अशा मुलींना या कोवळ्या वयात येणारे तणाव हे पुढील आयुष्यासाठी खूप धोकादायक होऊ शकतात.

याचा सर्वात मोठा परिणाम हा मुलींमध्ये असलेल्या शक्ती, हुशारी, बुद्धिमत्ता वाया जाण्यामध्ये होतो. त्यांच्यातील सहजता, आनंदी वृत्ती नाहीशी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींचा आत्मविश्वास कमी होतो. न्यूनगंड वाढतो, दिशाहीनता वाढते.  आणि मग मुली मागे राहू लागतात. स्वतःच्या कोशात जगायला लागतात, वरून ठीक दिसतात पण आतून तुटत जातात. अशाने मग काही करायची मानसिक इच्छा आणि शारीरिक ताकद दोन्हीही गमावतात. मग त्यांना समाज आळशी, उद्धट, रडक्या, भित्र्या, कामचुकार, नाजूक यापैकी काहीही लेबल लावून मोकळे होतो आणि हे घरोघरी सर्रास दिसते. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित घरांमध्ये सर्वत्र हे दिसते, हे जास्त धक्कादायक आहे.

आता खरा प्रश्न हा आहे की, यात मुलींना मदत कोण करणार? मुलींचे हे प्रश्न पालकांना कळत नाहीत आणि मुलींना तर त्यांच्या आयुष्यात नक्की काय चाललेय हेच कळत नाही. त्यामुळे असेच हे प्रश्न, ही अस्थिरता, ही अशांती मनात साचवत मुली मोठ्या होत राहतात, शिकण्यासाठी, करिअरसाठी धडपड करतात, पण त्या धडपडीत दम नसतो, स्पष्टता नसते. ती धडपड केविलवाणी होते.
आता ही कुटुंबातील वा समाजातील बाह्य परिस्थिती बदलणे, त्यांची मानसिकता बदलणे हे कठीणच. त्यामुळे स्वतःच स्वतःला मदत करणे व आपले अंतरविश्व बदलणे हे सगळ्यात उत्तम. त्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःच्या दिसण्यावर खूप मुलींना कॉम्प्लेक्स असतो. त्यात त्यांची खूप मानसिक ताकद खर्च होते. अशावेळी नेहमी लक्षात ठेवायचे की, चेहरा, उंची, शरीरयष्टी हे निसर्गतः आलेले असते, पण स्वभाव गुण, उत्तम विचार, बौद्धिक कुवत व आनंदी मन हे ठरवून बदलता येते, वाढवता येते आणि अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते. तसेच घरात, घराबाहेर कितीही चुकीची वागणूक मिळाली, टीका झाली, चेष्टा झाली तरी आपण स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवायचे नाही. स्वतःमध्ये न्यूनगंड तेव्हा वाढतो जेव्हा आपण चुकीच्या लोकांकडे किंवा त्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देतो.

स्वतःच्या चुकांमधून शिकायचे. कुणाला अभ्यास न केल्याने कमी मार्क मिळतात, कुणी घरात खोटे बोलते, चोरी करते, कुणी उद्धट वागते. या सगळ्या चुका स्वतःशी मान्य करणे आणि परत त्या होऊ द्यायच्या नाही याचा निर्धार करणे त्याचबरोबर स्वतःला माफ करणे हा प्रयत्न करत राहणे मनाला शांत आणि स्थिर बनवतो.

आजूबाजूची परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यामुळे स्वतःची किव करत रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी चार हात करायची हिंमत अंगी बाळगावी. आपल्याला आवडणारी गोष्ट करावी. वाचन, संगीत, फिरणे हे छंद तुम्हाला नकारात्मक अनुभव, विचार, व्यक्ती यातून बाहेर पडण्यास मदत करतात आणि आपल्याला ऊर्जा आणि प्रोत्साहन देणारे व्यक्ती, पुस्तके, अनुभव, आठवणी, विचार यांनाच आयुष्यात स्थान द्यावे. स्वतःच्या क्षमता विकसित करण्याचा सतत प्रयत्न करावा. भीती आपल्याला आपल्या क्षमता विकसित करण्यापासून लांब ठेवते. त्या भीतीला सामोरे जायची सवय लावावी. पडले, चुकले, कुणी हसले तरी चालेल पण ही वाटचाल चालू ठेवायला हवी.

थोडक्यात, आपण स्वतःला जितके शरीराने आणि मनाने सक्षम बनवत जाऊ, आयुष्याचे ध्येय आणि दिशा जसजशी मिळवत जाऊ तसतसे स्थिर, आनंदी व समाधानी आयुष्याकडे वाटचाल करायला लागू.

-दीपाली खेडकर

शब्दगंध : आत्मशांती : स्वीकारातून आत्मशांतीकडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘आत्मशांती’ मनाशी व विचारांशी निगडीत आहे. पण त्याचा मनासह शरीराशी संबंध आहे. शरीर, मन सुदृढ व आनंदी असेल तर आत्मशांतीचा अनुभव चांगला येऊ शकतो. शरीर आणि मनामध्ये परस्पररीत्या एक प्रकारचा सलोखा आणि लय असणे गरजेचे असते. या समन्वयाच्या स्थितीतूनच आत्मशांती निर्माण होऊ शकते. तसेच आपल्या विचारांमधील तात्विकता व भावनिकता याचा समतोल असणे पण गरजेचे असते. आपल्या भोवतालची परिस्थिती, व्यक्ती व त्यांचा स्वीकार यातूनच हा प्रवास सोपा होऊ शकतो.

पल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध, काही पटणार्‍या तर काही ‘न’ पटणार्‍या, काही आवडणार्‍या तर काही न आवडणार्‍या. या सगळ्या अनुभवातून जेव्हा मन स्थिर राहते त्या स्थितीला आपण ‘आत्मशांती’ म्हणू शकतो. ही स्थिती अचानक येत नाही, तो एक प्रवास आहे. आत्मशांती हेच जर का ध्येय मानले तर त्याकडे जाणार्‍या वाटा अनेक आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतात. एखाद्याला काम करताना आत्मशांतीचा मार्ग सापडतो, तर एखाद्याला तो निसर्गात, संगीतात, स्वत:मध्येच सापडू शकतो.

आपले पंचेंद्रियांमधून देखील आपण विविध अनुभव घेत असतो. हे अनुभव जेव्हा आनंदाकडे जातात, आपल्याला शांत अनुभवात नेतात. आपल्या स्वत:कडे बघायलाही पंचेंद्रिय मदत करू शकतात. यातून निर्माण होणार्‍या जाणिवा मन व शरीराला दिशा देऊ शकतात.
माझ्या कामांतर्गत मी अनेक लोकांना भेटत असतो. बर्‍याच वेळा ते त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे आलेले असतात. त्यांच्या परिस्थितीतील कोलाहल, मनातील द्वंद मला जाणवत असते. अशावेळेस त्यांचे समाधान मी करू शकलो तर तो क्षण मलाही समाधान देणारा ठरतो. हीसुद्धा एकप्रकारची त्यावेळेला मिळालेली आत्मशांती असते.

जेव्हा मी सायकलिंग, स्वीमिंग, रनिंग करतो; ते करणे मी आनंदाने स्वीकारलेले असते. धावताना मी पूर्णपणे त्या धावण्यात रमलेलो असतो. माझे धावणे मी आणखी कसे सुधारू शकतो किंवा पोहोतांना माझे टेक्निक किती योग्य होऊ शकते याकडे माझे लक्ष असते. सायकलिंग करताना तर माझ्यात आणि सायकलमध्ये एक नाते जडते. या सगळ्या क्रिया करताना ते करण्यात हरवतो. ते हरवणे म्हणजेच आत्मशांती आहे, असे मला वाटते.

स्वत:ला स्थीर ठेवण्यामध्ये आत्मचिंतन, ध्यानधारणा व व्हिजुलायझेशन याचा चांगला उपयोग करता येतो. आपल्यालाा जी परिस्थिती हवी आहे त्यामध्ये विश्वास ठेऊन तिच्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकणे यातसुद्धा मोठी ताकद असते. रोजच्या जीवनात आपण सातत्याने कशान कशाचा शोध घेत असतो. काही ना काही गाठण्यासाठी धावत असतो. कुठल्या न कुठल्या प्रकारचा संघर्ष करत असतो. यातून कधी मन थकते तर कधी शरीर. अशा वेळेसच खरे तर आत्मशांतीचा शोध सुरू होतो. विविध मार्गातून ती सापडते. ती कधी क्षणिक असते तर कधी दीर्घकाळ टिकणारी असते.

परंतु आत्मशांती लाभली म्हणजे आपल्या विवंचना थांबतील, असे नाही, तर पुढे सरकणार्‍या आयुष्यामध्ये त्या परतही येतील. सकारात्मक आणि जिद्दीने सामोरे जाणे व त्यातून एक शांत परिस्थिती निर्माण करणे हे आपल्याला सातत्याने करावे लागेल. विवंचना व सुखशांतीचा हा प्रवास अनादी काळापासून सुरू आहे. तो पुढेही चालेलच. या प्रवासाला कोण कसे सामोरे जातो हेदेखील प्रत्येक जण आपल्यासाठी ठरवू शकतो.

पोलीस दलामध्ये काम करताना एक फोर्सचा अधिकारी असतो. हे काम करताना मी ऐकण्याची कला शिकलो. त्यातून मला लोकांना समजून घ्यायला मदत झाली. त्यांची मते वेगळी असली तरी त्यांचा आदर करायला शिकलो. यातूनच सापडला तो कॉमन गोलकडे जाण्याचा मार्ग. या कॉमन गोलमध्ये परस्परांचा आदर, विविध मतप्रवाहांचा स्वीकार, परिस्थितीकडे पाहण्याची सकारात्मकता व स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याची भूमिका घेणे आवश्यक असते. हे करताना एक मार्ग निवडावा लागतो आणि त्यावर विश्वासाने आणि खंंबीरपणे उभे राहावे लागते. स्वत:मधील द्वंद, एकाच वेळेला येणारे अनेक विचार हे काही नीतिमूल्य डोळ्यासमोर ठेऊन हाताळावे लागतात.

मला या सगळ्या आत्मशांतीच्या प्रवासात नेहमी मदत होते ती स्वसंभाषणाची. आपण स्वत:शी बोलले पाहिजे, मनामध्ये येणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जेव्हा स्वत:शी संभाषण साधतो तेव्हा विविध पैलू तपासून बघतो. एकतर्फी विचारांपासून दूर जाऊन सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विचार करण्याची सवय लागते आणि यातूनच समाधान देणारे उत्तर मिळू शकते. एका अर्थाने हाच प्रवास महत्त्वाचा असतो.

आत्मशांतीच्या या प्रवासात इतरांबद्दलचे पूर्वग्रह, मतसुद्धा वेळोवेळी तपासावे लागतात. आपले कुटुंबीय, आप्तजन, मित्र परिवार आणि ज्यांच्या बरोबर काम करतो ते सहकारी या सर्वांचा स्वीकार ते आहे तसाच करावा लागतो. कधी त्यांना समजून घ्यावे लागते, कधी समजून सांगावे लागते. आत्मशांतीच्या या प्रवासात आपल्या भोवतालची माणसे महत्त्वाची ठरतात व त्यांचा स्वीकार आपण कसा करतो यावर आपली मानसिक स्थिती अवलंबून असते. या बाबतीत मला गालिबचा शेर आठवतो, किंबहुना या वाक्यांनी खूप मदत होते.

‘कुछ इस तरह मैने जिंदगी को आसान कर लिया,
किसी से मांग ली माफी, किसी को माफ कर दिया…’

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल,
विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र

पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा विषयावर एकात्मिक अभ्यासक्रम; पुढील वर्षी होणार सुरुवात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर पाच वर्षे मुदतीचा एकात्मिक अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षीपासून सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासह विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही (यूजीसी) मान्यता मिळाली आहे.

या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रियाही राबवली जाणार आहे. संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयात उपलब्ध असलेले बहुतांश अभ्यासक्रम हे पदवी, पदव्युत्तर किंवा प्रमाणपत्र प्रकारातील आहेत. मात्र, विद्यापीठाने पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा पहिला मान मिळविला आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. संरक्षणशास्त्र विषयातील राज्यभरातील तज्ज्ञांसह देशभरातील तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू राहणार आहे. ‘पदवी आणि पदव्युतर पदवी मिळून एकूण दहा सत्रांचा हा अभ्यासक्रम आहे. बारावीत कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या विद्यार्थ्यांला एम. ए. आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला एम. एस्सी पदवी मिळेल. या अभ्यासक्रमातून संरक्षण क्षेत्रासाठी सक्षम थिंक टँक तयार करण्याचा उद्देश आहे. येत्या काळात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण होईल.

हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांतील प्रशासकीय जागा, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते. भारतात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अनुदान देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्टये*
*इंग्रजी भाषा
*स्थानिक ते जागतिक पातळीवरील संरक्षण आणि सामरिकशास्त्र संकल्पना
* संरक्षण क्षेत्राशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान
* विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा
* संरक्षण आणि सामरिकशास्त्राचे विविध पैलू
* पररराष्ट्र धोरण
* राष्ट्रीय संरक्षण संस्था
* सायबर सुरक्षा
* देशांतर्गत सुरक्षा
* क्षेत्रभेटी

Eco-park to be developed along both sides of Godavari

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

Godavari river which is known as southern Ganga river has been included in the central government’s Namami Gange project. Under this project, the eco-park will be developed along both sides of the Godavari river. In addition, various eco-friendly projects will be undertaken.

For this, Nashik Municipal Corporation (NMC) has been instructed to table a special action report till December 20. Fund of Rs 50 to 100 crore is likely to be received for this project. The central government has undertaken Namami Gange project to revive 9 principal rivers in the country.

Godavari river which is originated from here has now been included in this project. The central government has taken this decision considering pollution issue in Godavari river and instructions by Mumbai High Court to state government and NMC to take measures for this.

The High Court has formed a high-level committee to curb pollution and measures are being taken through this s per directives by the agencies. Maharashtra Pollution Control Board is taking various measures to deal with pollution. In addition, the smart city company will soon undertake Goda project for beautification of Godavari river.

The capacity of sewage treatment plants is also being increased to process sewage water in the city and action plan regarding this has been sent to the Centre. In addition, NMC has sought aid from the Centre for the cleanliness of Godavari river.

The central government has given its nod to provide aid to make Godavari pollution-free under the Namami Gange project and instructed to table the plan till December 20. A responsibility to prepare this new project plan has been given to NMC garden department chief and deputy municipal commissioner Shivaji Amle.

Accordingly, officials of the garden department are working to prepare the plan. Some eco-friendly projects will be conducted along both banks of Godavari in the 5-km distance from Someshwar to Ahilyabai Holkar bridge. Trees will be planted to stop soil erosion and other measures will also be taken as well.

It will be proposed to construct eco-park and gabion wall to for this. In effect, the Godavari river will be flowing all time, claiming the NMC garden department.

Rs 100 cr plan by NMC

On the lines of central government Namami Gange project, NMC is preparing a plan having the development of the eco-park, construction of gabion wall and other things for the cleanliness of Godavari river. A fund on large scale is being given for revival of 9 rivers like Krishna, Tapi, Narmada and others. Like this, a plan around Rs 50 to 100 crore under this project will be sent to the Centre. The centre is likely to give fund up to Rs 100 crore to make Godavari pollution-free.

गवार, भेंडीचे भाव गरम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भाजीपाल्याचे भाव उतरले

अहमदनगर (प्रतिनिधी)- किरकोळ भाजीबाजारात कडाडलेले भाजीपाल्याचे भाव उतरले असले तरी गवार आणि भेंडीचे भाव मात्र चढेच आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. शंभरी पार केलेला कांदाही किरकोळ बाजारात पन्नाशीत आला आहे.

अतिवृष्टी व अवेळी पाऊसानंतर सर्वच भागांत भाजीपाल्याचे वाढलेले उत्पादनाने मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे दर उतरले. पालेभाज्यांचे दर उतरल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

लाल कांद्याची आवक वाढल्याने अन् इतर राज्यातील मागणी थंडावल्याने कांद्याचे दरही घसरले आहे. शंभरी पार केलेला कांदा आता पन्नाशीत आला आहे. शंभर रुपये किलो भावाने विकले जाणारे टोमॅटो आता अवघ्या 10 रुपयांत मिळत आहे. तिशीत पोहचलेली मेथी, पालक, कोंथबिर पाच-दहा रुपयांवर आली आहे. 80 रुपये किलो मिळणारी वांगी 20 रुपये किलो विकली जात आहेत.

ओला वटाणा 100 रुपये किला होता. तो आता 25 ते 40 रुपये किलोने मिळू लागला आहे. लिंबूचेही दर घटले आहेत. गवार आणि भेंडीच्या भावाची थंडीतही गरमागरमी सुरूच आहे. गवार 80 रुपये तर भेंडी 60 रुपये किलो भावाने विक्री होत असल्याचे दिसले. मिरची तीस रुपयांवर घसरली आहे.

नगर: दो भाई बच गये… रवि, प्रकाश खतरे में

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भिंगार कॅन्टोन्मेंट । शिवसेना सदस्यांच्या वार्डात महिला आरक्षण

भिंगार (वार्ताहर) – आगामी कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी आज लेडीज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड लेडीजसाठी राखीव झाले. त्यामुळे भिंगार शिवसेना शहर प्रमुख रवींद्र लालबोंद्रे आणि प्रकाश फुलारी या दोघाही शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना दुसर्‍या वार्डाचा शोधाशोध करावी लागेल अथवा उमेदवारीसाठी कुटुंबातील महिला पुढे करावी लागणार आहे.

सात वार्ड असलेल्या भिंगार छावणी मंडळाची निवडणूक नव्या वर्षात होणार आहे. दोन महिलेसाठी आणि एक जागा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. पूर्वी मीना मेहतानी यांचा 1 नंतर तर शुभांजी साठे यांचा पाच नंबर वार्ड लेडीजसाठी राखीव होता. आज नव्याने महिला राखीव वार्डासाठी सोडत काढण्यात आली. त्यात लालबोंद्रे यांचा 4 नंबर तर फुलारी यांचा 6 नंबर वार्ड महिलेसाठी राखीव निघाला. यामुळे या दोघांनाही आता कुटुंबातील सदस्याला उमेदवारीला पुढे करावे लागेल अथवा स्वत:साठी दुसरा ‘सेफ’ वार्ड शोधावा लागणार आहे.

पाच नंबर वार्डाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भाजप नगरसेविका शुभांगी साठे यांचा वार्ड आता खुला झाला आहे. त्या स्वत: पुन्हा निवडणूक लढणार की पती निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याकडे भिंगारकरांचे लक्ष लागून आहे. मीना मेहतानी यांचाही वार्ड आता खुला झाला आहे. एससीसाठी राखीव असलेला वार्ड नंबर सातमधील लोकसंख्या पाहता यंदाही या वार्डातील आरक्षण कायम राहिले आहे.

उपाध्यक्ष मुस्साभाई पुन्हा रिंगणात

राष्ट्रवादी च्या मीना मेहतानी, मुस्सा सय्यद आणि कलीम शेख या तिघाही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड आहे तसेच राहिले आहेत. यातील उपाध्यक्ष मुस्सा सय्यद आणि कलीम शेख यांच्या वार्डात महिला आरक्षण पडते का? याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. पण आरक्षण सोडतीत ते बालंबाल बचावले.