Wednesday, June 10, 2026
Home Blog Page 13389

नाशिक @१२.६ अंश सेल्सियस; वाढलेल्या गारठ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

अचानक वातावरणात आज बदल झाला आहे. नाशिकचे किमान तापमान आज अचानक घटले असून १२.६ अंशावर स्थिरावले आहे. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद महाबळेश्वरसोबतच नाशिकमध्ये होत असते. त्यामुळे या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचा सल्लाही वैद्यकीय अधिकारी देत असतात.

अचानक वाढलेल्या थंडीमुळे शरीरात पाणी पिण्याची गरज कमी होते. अनेकांना गारठ्यात पाण्याची तहान लागत नाही. अनेकदा थंड पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन होण्याची भीती असते. यामुळे तापमान आणि शरीरातील पाणी यास नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात ८-१० ग्लास पाणी दररोज पिणे स्वाभाविक असते. परंतु हीच परिस्थिती गर्थ्य्त नसते. तहान तापमानासाठी महत्वाची गोष्ट आहे तर डीहायड्रेशन चे संकेत मिळतात.

गारठ्यात किमान ३ ते ४ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. गार पाणी न पिता पाणी कोमट करून प्यायला हव असेही तज्ञ सांगतात.

हिवाळ्यात मुख्यत्वे या वेळी पाणी प्यावे

१. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील अवयव सक्रीय होण्यास मदत होते. पाण्यामुळे दिवसातील भोजनाच्या पूर्वीचे शरीरात साठलेले विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

२. भोजन करण्याच्या तीस मिनिट आधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ध्यानात ठेवा जेवणाच्या पूर्वी आणि नंतर लगेचच पाणी पिऊ नये.

३. अंघोळीच्या आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातून कुठल्याही प्रकारचा फ्लुईड लॉस होत नाही.

पाण्याची दिनचर्या अशी हवी

सकाळी ७ वाजता : पहिला ग्लास पाणी प्यावे

सकाळी ९ वाजता : दुसरा ग्लास, नाश्ता केल्यानंतर १ तासानंतर पाणी प्यावे

सकाळी ११.३० वाजता : तिसरा ग्लास दुपारचे जेवण घेण्याआधी अर्धा तास आधी पाणी प्यावे.

दुपारी १.३० वाजता : चौथा ग्लास दुपारचे जेवण झाल्यानंतर दुपारी दीड च्या सुमारास पाणी प्यायला हवे.

दुपारी ३ वाजता : पाचवा ग्लास चहा घेण्याच्या वेळी एक ग्लास पाणी घ्यावे

सायंकाळी ५ वाजता : सहावा ग्लास यावेळी प्यायल्याने रात्रीच्या जेवणावेळी होणारे ओव्हरइटिंग होणार नाही.

रात्री आठ वाजता : सातवा ग्लास : रात्री जेवणाच्या १ तासांनी पाणी प्यावे.

रात्री दहा वाजता : आठवा ग्लास झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्यावे.

शेणित : ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इगतपुरी : शेणित परिसरात प्रारंभी पाणीटंचाईने, त्यानंतर कडवा, दारणा व ओहळांना आलेल्या महापुराने आणि शेवटी अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस वाचविले त्याची आता पाने पिवळे पडून त्यावर लाल ठिबके पडत असून, त्यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

दरम्यान ढगाळ वातावरण आणि वाढती थंडी यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. यामुळे उत्पन्नाची सरासरी घटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.नगदी पीक आणि कमी खर्च, कमी मेहनत म्हणून गोदाकाठचा शेतकरी उसाला नेहमीच पसंती देत आला आहे. साधारणत: जुलै ते आॅगस्टदरम्यान उसाची लागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे बेणे घ्यावे लागते. शेतीचीनांगरणी, सरी पडणे, वाफे बांधणे व त्यानंतर ऊस लागवड व लागवडीबरोबरच प्रारंभी खताचा पहिला डोस द्यावा लागतो.

साहजिक प्रारंभी एकेरी २० ते २५ हजार रु पये खर्च करून हे पीक उभे करावे लागते. निफाडसह गोदाकाठ भागात खोडवा, आडसाली सुरू उसाचे उत्पादन घेतले वर्षी. मात्र यावर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाई हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, नदी विहीर शर्तीचे प्रयत्न करून उसाचे पीक वाचविले. त्यानंतर गोदावरी आलेल्या महापुराने झाला. अतिपाण्यामुळे पिके सडली तर आता अतिवृष्टीमुळे व ढगाळ वातावरण तसेच वाढती थंडी यामुळे उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे.

या रोगापासून जे वाचले ते आता साखर कारखान्यांना तोडून देण्याची वेळ आली असताना काही दिवसांची पाने पिवळी पडून लालसर ठिपके पडू लागले आहेत. साहजिक उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सरासरी उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व पिकांवर येणाºया विविध रोगांबाबत कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे.

चाळीसगाव : पं.स.मधील ४८१ सिंचन विहिरींच्या लाचेचे पंचायत ‘राज’ कायम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सत्ताधार्‍यांसह विरोधकांची दोन वर्षांपासून चुप्पी, 

वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊनही कारवाई मात्र शून्य

मनोहर कांडेकर

। चाळीसगाव

महात्मा गांधी रोजगार हमी (मनरेगा) अतंर्गत मजुंर 481 आहिल्यादेवी सिंचन विहिरींना मान्यता देतांना प्रती विहिरी 15 हजार रुपये (लाच) घेतल्याचा घोळ गेल्या दोन वर्षांपूर्वी (सन 2017) उघडकीस आला होता. सत्ताधारी व विरोधकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून येथील पंचायत समितीचे तत्कालीन बीडीओ मधुकर वाघ यांनी दि.2 नोव्हेंबर 2017 रोजी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता  हे प्रकरण राज्यभर गाजले.

त्यानंतर गटविकास अधिकार्‍यांची बदली झाली. वरिष्ठ स्तरावरुन या प्रकरणाची चौकशीही झाली; परंतु पैसे घेणार्‍या सदस्यांवर व आधिकार्‍यांवर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तसेच या मंजुर विहीरी देखील अद्याप लालफितीत आडकल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणाचे नेमके झाले काय? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे, चौकशीच्या नावाखाली हे प्रकरण दाबण्यात तर आले नाही ना? असा सूर आता निघू लागला आहे.

एम.आर.ई.जी.एस अंतर्गत मजुंरी देण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत 481 सिंचन विहिरीच्या कामांमध्ये गटविकास आधिकारी व काही जि.प.सदस्य व पं.स.सदस्य मिळुन मजुंरीसाठी घोळ केला होता.  मंजुर 481 विहिरींना मान्यता देतांना प्रती विहिरी 15 हजार रुपयांची लाच शेतकर्‍यांकडून घेतल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनीकडून एकमेकांवर केले व त्यातील 10 टक्के कमीशन हे गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्याचे देखील पत्रपरिषदेत घेवून सांगण्यात आले होते.

भाजपाचे सत्ताधार्‍यांनी हा घोळ केला आहे. पं.स.चे सभापती पती दिनेश बोरसे व त्यांच्या सहकार्‍यांनी  विहिर मजुंर करण्यासदंर्भात 5 लाख 60 हजार रुपय जमा केले असल्याची खळबळ जनक माहिती राष्ट्रवादीच्या गटनेत्याने पत्रपरिषदेत त्यावेळेस सन 2017 मध्ये दिली होती.

तर भाजपातर्फे राष्ट्रवादीचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनीच विहीर मंजुरीमध्ये घोळ केल्याचे सांगण्यात येत होते. विहीरीला मंजुरी देण्यासाठी शेतकर्‍यांकडून पैसे उकळण्यात आलेले  दोषीवर योग्य ती कारवाई होण्यासाठी आम्ही सर्वांनुमते ठराव करुन, गटविकास आधिकारी मधुकर वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव केला.

परंतू राष्ट्रवादीचे जि.प. व पं.स. सदस्य हे गैरकारभारला साथ देत गटविकास अधिकार्‍यांची पाठराखण का करता? असा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादीच्या सदस्यांचाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप पत्रपरिषदेत सभापती स्मितल बोरसे व उपसभापती संजय पाटील यांनी त्या वेळेस केला होता.

तसेच आरोप खोटे असून ते सिद्ध झाल्यास आम्ही तत्काळ पदाचा राजीनामा देऊ. आरोप करण्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याच्या फुशारक्या मारत संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होऊन जनतेपुढे दुध का दुध पाणी का पाणी बाहेर यायला हवे, अशी मागणी दोन्हीकडून केली जात होती.

वास्तविक त्यावेळेस महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत(मनरेगा) विहिर मजुंर करणासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचा ठराव केला जायचा, आणि नतंर हा प्रस्ताव पचायत समितीकडे पाठविण्यात यायचा. परंतू असे न करता, त्यावेळेस काही प.स.सदस्यांनी व गटविकास आधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन, शेतकर्‍यांकडून पैसे घेऊन परंपस्पर प्रस्ताव सादर करुन, 481 विहिरीना मंजुरी दिली होती.

आपले पिंतळ कधी तरी उघडे पडणार म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्षांनी विहीरचा मंजुर करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करत, आपल्यावरील संकट दुसर्‍यावर झटक्याचा प्रयत्न त्यावेळेस चांगल्या पद्धतीने केला होता. दोन्हीकडील आरोपांची तिव्रता पाहता दोन्ही पक्षातील सदस्यांनी विहिरी मंजुर करण्यासाठी पैसे खाल्याचे जवळपास सिद्ध झाले होते. तसेच एकमेंकावर आरोप केल्यामुळे जनतेसमोर आम्ही पैसे खाल्ले नसल्याची बनवा-बनवी देखील त्यावेळेस करण्यात आली होती.

जिल्हास्तरीय चौकशी समितीची नेमणूक देखाव्यासाठी?

पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकार्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नतंर विहीरीच्या मजुंरीबाबतच्या घोळाबाबत तात्काळ जिल्हास्तरीय चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली होती. तसेच पंचायत राजच्या समितीने देखील विहीरीच्या मंजुरीबाबत चौकशी केली होती.

परंतू दोन वर्ष झाले, अजुनही या समितीने पाठवलेल्या अहवालावर कारवाईच्या नावाने बोंबाबोब आहे. गेल्या दोन वर्षांपासून विहीरी मंजुरीच्या लाचेचं पंचायत ‘राज’ बाहेर आलेले नाही. त्यामुळे आता केंद्रीय स्तरावर पुन्हा या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, पंचायत समितीचा कार्यकाळ संपण्याच्या आत दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

गटविकास अधिकार्‍यांचा  आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रयोग… 

पं.स.चे तत्कालीन गटविकास आधिकारी मधुकर वाघ यांनी दि.2 नोव्हेंबर 2017  रोजी सिंचन विहिर व मनरेगा कामांमध्ये सत्ताधारी व ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने हस्तेक्षेप करुन, घोळ करण्यासाठी दबाव आनुन, सक्तीच्या रजेवर पाठविल्यामुळे राजकारण्यांचा जाचळा कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचा आरोप करत, विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयोग त्यावेळेस करण्यात आले होते. तशा आशयचा चिठ्ठीदेखील त्यांच्या खिशात सापडली होती. त्यावरुन चाळीसगाव पोलिस स्टेशनला सन 2017 मध्ये पंचयात समितीच्या सभापती स्मितल बोरसे, त्यांचे पती दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील, ग्रामपंचयात संघटनेचे सजिव निकम यांच्या विरोधात भादंवी कलम 506, 34 व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चांगलेच गाजले होते. परंतू काळ लोटत गेला, तसतसे हे प्रकरण थंड बसत्यात गेले. आजपर्यत सिंचन विहीरीचा मंजुरीबाबतचा शेतकर्‍यांकडून कसे पैसे उकळले व कोणी उकळले याबाबत एकावरही आरोप सिद्ध करण्यात आले नाहीत.

सप्तशृंगी गड : शौचालय बांधा अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार; ग्रामस्थांचा संताप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : सप्तशृंगगड येथील परम पूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालयात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना अक्षरक्ष: उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता की और’असे म्हणत घरोघरी शौचालयाचा नारा दिला आहे, परंतु या शाळेत शौचालयाने नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या विद्यालयामध्ये 214 विद्यार्थी व वसतिगृहाचे ही विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेची दुपारीची सुट्टी झाली की मुलींनी लघुशंकेसाठी कुठेे जावे? असा प्रश्न त्यांना पडतो. येथे शौचालयाची सोय नसल्याने त्यांना नाईलाजाने शौचालयासाठी व लघुशंकेसाठी उघड्यावरच जावे लागते.शासन शौचालयाबाबत सर्वत्र जनजागृती करून गावागावात व तालुक्याच्या ठिकाणी भिंतीवर शौचालयाचे चित्र रेखाटून संदेश पोहचवताना दिसत आहे. शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचालयास बसू नये अशा प्रकारचे शिक्षण देत आहे, परंतु ते सर्व फोल ठरत आहे.

येथे पाचवी ते दहावीपर्यंतचे व वसतिगृहाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागते ही लज्जास्पद बाब आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी प्रशासनाला जाब विचारला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शौचालयास बाहेर उघड्यावर जावे लागते तरी त्वरीत शौचालय बाधूंन मुला- मुलींची होणारी हेळसांड थांबवावी, असा अर्ज ग्रामस्थांच्या व पालकांच्या वतीने मुख्याध्यापकांना देण्यात आला होता, परंतु शौचालयाचे काम सुरू झाले, मात्र ते काही दिवसांतच अर्धवट स्थितीत बंद पडले.

गेल्या काही महिन्यांपासून शौचालयाचे काम बंद असल्याने या कामाबाबत बेनके यांनी या शाळेचे मुख्याध्यापक डी. एन. नवले यांना विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन आपल्या अंगावरचे घोगंडे झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष देवून शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी संतप्त पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील असल्याने त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र वसतिगृह असोत की आश्रमशाळा त्यांची अवस्था बिकट होऊनही त्याकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरसोयींचा सामना करत विद्यार्थी शिक्षण घेत असतात.
-राजेश गवळी, उपसरपंच

पेट्रोलने ८०चा टप्पा ओलांडला तर डिझेल ६९ रुपये प्रतिलिटर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून पेट्रोल प्रतिलिटर ऐंशीपार गेले आहे तर डिझेलही प्रतिलिटर सत्तरीच्या घरात पोहोचले आहे. गुरुवारी (दि.12) पेट्रोल 81.17 रुपये तर डिझेल 68. 76 रुपये इतका दर होता.

तेलाचे प्रमुख उत्पादक असलेल्या अरब राष्ट्रात अस्थिरतेची परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. त्याचे परिणाम भारतावरदेखील झाले आहेत. पंधरा दिवसात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत डिझेल दरात किरकोळ दरात साधारणत: दीड रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर खाली उतरत नाही तोपर्यंत इंधनाचे दर पुढील काळात वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कंपन्यांच्या हाती दरवाढ
‘युपीए’ सरकारच्या काळात इंधन दरवाढीवर सरकारचे नियंत्रण होते. दरवाढीची सर्वसामान्यांना झळ बसू नये, यासाठी सरकार इंधन कंपन्यांना सबसीडी द्यायची. मात्र, 2014 मध्ये केंद्रात ‘एनडीए’ सरकार सत्तेत आल्यावर इंधनाचे दर नियंत्रण मुक्त केले. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरानुसार दररोज इंधनाचे दर बदलत असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईल दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे नियंत्रणमुक्त आहे. बाजारपेठेतील चढ- उतारानुसार पेट्रोल व डिझेलचे दरात बदल होत आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार आहे.
-भूषण भोसले, जिल्हाध्यक्ष पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन, नाशिक

इंंधन दरवाढीचा आलेख
(लिटर/ रुपये)
तारीख                  पेट्रोल        डिझेल
1 नोव्हेंबर             78.88     68.29
10 नोव्हेंबर           79.07     68.46
17 नोव्हेंबर           80.09     68.46
30 नोव्हेंबर           81.04     68.45
9 डिसेंबर              81.21     68.76

13 December 2019

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कुसुमाग्रजांचे नाव द्या; काँग्रेस सेवादलची मागणी: सीएमला निवेेदन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कवीश्रेष्ठ व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचे नाव दिले जावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाकडून करण्यात आली आहे. सेवादलाचे नाशिक शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामांतराचा वाद सुरू असताना आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेही नामकरण केले जावे, ही मागणी पुढे येत आहे. नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नामांतराला त्यामुळे तोंड फुटले आहे. युती सरकारमध्ये डॉ. दौलतराव आहेर आरोग्यमंत्री असताना त्यांनी नाशिकचे ऋण फेडत, या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. 3 जून 1998 ला विद्यापीठाची स्थापना झाली.

राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. मागील भाजप सरकारकडून या विद्यापीठाला स्व. डॉ.दौलतराव आहेर यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, काही कारणास्तव हा नामांतराचा प्रस्ताव बारगळला होता. कोल्हापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे देखील नामांतर केले जावे, अशी मागणी जोर धरत आहे. काँग्रेस सेवादलने या विद्यापीठाला कवीवर्य कुसुमाग्रज यांचे नाव दिले जावे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोशारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करावे; उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

दूषित पाण्यामुळे कुठल्याही प्रकारचे गंभीर आजार होऊ नये,यासाठी ग्रामपंचायतीने नियमित व दैनंदिन पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ग्रामस्थांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असून ग्रामपंचायत हद्दीत असणारे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत परिसर यांची नियमित साफसफाई त्याचप्रमाणे रासायनिक आणि जैविक पाणी नमुना तसेच टीसीएल तपासणी करणे आवश्यक आहे.

यामुळे निश्चितच आपण पाण्यामुळे होण्यार्‍या साथरोगांवर प्रतिबंध घालू शकतो.जिल्ह्यामध्ये एकूण 7329 स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले असून त्यामध्ये 154 ग्रामपंचायतीना मध्यम जोखीम प्रमाणपत्र( पिवळे कार्ड) देण्यात आले आहे. पिवळ्या कार्डच्या त्रुटी त्वरित दूर करून त्याचे हिरव्या कार्डमध्ये रूपांतर करण्याबाबत ग्रामपंचायत यंत्रणेला शेळकंदे यांनी निर्देश दिले जिल्ह्यात मान्सूनपश्चात रासायनिक तपासणी अभियान दिनांक 1 ऑक्टोबर पासून सुरु झालेले असून आरोग्य व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोबाईल अ‍ॅप्लीकेशन द्वारे 90टक्के जिओ टगिंग करण्यात आले.

या आढावा बैठकीत आदर्श ग्राम किकवारी (खुर्द)ता.सटाणा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केदा बापू काकुळते यांनी ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजनासाठी दैनंदिन पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीनेटर नावाचे उपकरण तयार केले असून त्याद्वारे पाण्याच्या टाकीवर न चढता टाकीच्या खालीच पाण्याचे टी.सी.एल.पावडरद्वारे शुद्धीकरण करता येते. सदर उपकरण कशा पद्धतीने वापरायला पाहिजे यावर केदा बापू काकुळते यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीला भूजल विकास सर्वेक्षणचे जीवन बेडवाल,आरोग्य विभागाचे डॉ.पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रतिनिधी, तालुका स्तरावरील विस्तार अधिकारी आरोग्य आणि ग्रामपंचायत, उप विभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक यांच्यासह पाणी स्वच्छता कक्षातील तज्ज्ञ उपस्थित होते.

55 हजार शेतकर्‍यांचा डाटा आधार कार्डशी लिंक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘पीएम’ किसान सन्मान योजना : पावणेदोन लाख जोडणी बाकी

नाशिक । प्रतिनिधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात तीन लाख लाभार्थी शेतकर्‍यांपैकी 55 हजर शेतकर्‍यांचा डाटा आधार कॉर्डशी लिंक करण्यात आला आहे. अद्याप 1 लाख 73 हजार लाभार्थी आधारलिंक करणे शिल्लक असून जिल्हा प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. आधार लिंक नसल्यास पीएम किसान योजनेचा तिसरा हप्ता मिळणार नाही.

लोकसभा निवडणुकीपुर्वी केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यासाठी पीएम किसान योजना सुरु केली. अल्प भू धारकांना ही मदत मिळणार होती. लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यावर शेतकर्‍यासाठी सरसकट ही योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत 1 ऑगस्ट 2019 पासून डाटा आधारलिंक असलेल्य पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार होते. या नवीन अटीमुळे राज्यात लाखो शेतकरी योजनेच्या अनुदानापासू वंचित राहण्याची शक्यता होती.

त्यामुळे केंद्र शासनाने सदरची बंधनकारक अट लाभार्थ्यांचा डाटा आधारलिंक करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतच शिथील केली. पण या मुदतीत जिल्ह्यातील केवळ 55 हजार लाभार्थ्याचेच आधारलिंक झाले. आजही 1 लाख 73 हजार शेतकरी आधारलिंक विना आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरुन त्यांना मिळणारा 2 हजार रुपयांचा तिसरा हप्ता मिळुु शकलेला नाही. तर काहींना अद्याप दूसरा हप्ताही मिळालेला नाही. 1 डिसेंबर 2019 नंतर पात्र लाभार्थ्यास वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधारलिंक आधारितच करण्यात आले आहेत. त्या करीता पीएम किसान पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांना नावे आधार प्रमाणे दुरूस्ती करण्यासाठी सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या सुविधेमार्फत लाभार्थ्यांना पोर्टलवर जावून स्वत: दुरूस्ती करता येईल. तसेच संकेतस्थळावर देखिल आधारलिंक करता येणार आहे. या सुविधेमध्ये राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आधार दुरूस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्राची सुविधामार्फत मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थी त्यांची आधारकार्ड आधारीत माहिती पी.एम. किसान योजनेच्या पोर्टलवर जात लिंक करत आहेत.

जिल्हयातील कुपोषणात घट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

कुपोषणमुक्तीचा नाशिक पॅटर्न जिल्ह्यात चांगलाच यशस्वी होत असून जिल्हयातील कुपोषणात झालेली वाढ घटली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.यामुळेच नाशिक पॅटर्न राज्यभर राबविला जात आहे.जिल्हयात सद्यस्थितीत 814 बालके अतितीव्र कुपोषीत तर,4 हजार 210 बालेक मध्यम स्वरूपाचे कुपोषीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांपैकी हरसूल व पेठ प्रकल्पात सर्वाधिक कुपोषीत बालके आहेत.

ग्रामबालविकास केंद्र सुरू करावी,अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांकडून वारंवार होऊनही तत्कालीन महिला बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी याकडे दुर्लक्ष केले.अखेर यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी लक्ष घालीत ही केंद्र सुरू केली. मात्र,गिते यांची बदली होताच ही केंद्र बंद झाली.तीन महिन्यांपूर्वी कुपोषीत बालकांची संख्या ही 13 हजारांवर होती.मात्र,यामध्ये आता घट झाली आहे.

जिल्हयातील सर्वसाधारण 4 लाख 68 हजार 326 बालकाची वजने करण्यात आली होती.यात 814 अतितीव्र कुपोषित (सॅम) बालके आहेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर, 4 हजार 210 बालके मध्यम स्वरुपाची कुपोषित (मॅम) असून गरजेच्या वेळी त्यांना मार्गदर्शन व आहार दिला जात आहे.

प्रकल्पनिहाय तीव्र कुपोषीत बालके

पेठ (44), हरसूल (47), सुरगाणा (28), बार्‍हे (12), इगतपुरी (12), दिंडोरी (18), उमराळे (31), कळवण-1 (11), कळवण-2 (8), नाशिक (31), त्र्यंबकेश्वर (29), देवळा (16), बालगाण-2 (23), बागलाण-1 (23), सिन्नर-1 (6), सिन्नर (14), निफाड (11), पिंपळगाव (23), निफाड-3 (55), येवला-1 (7), येवला-2 (17), नांदगाव (13), चांदवाड 1 (13), चांदवाड-2 (9), मालेगाव (24), रावळगाव (7).

ग्रामपंचायतींना आदेश

कुपोषणाचे प्रमाण कमी कमी व्हवे,यासाठी ग्रामपंचायतींना‘आमचा गांव आमचा विकास’अतंर्गत दहा टक्के निधी राखीव ठेवण्याचेे आदेश देण्यात आले आहेत.या निधीतून प्रामुख्याने सॅम व मॅमच्या बालकांसाठी ग्रामबालविकास केंद्र सुरू करावयाचे आहे. मागील वर्षी ग्रामपंचायतींनी केंद्र सुरू केली. याचा परिणाम चांगला दिसून आला आहे.त्यामुळे यंदा ग्रामपंचायतींना निधी राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत त्यांच्याकडून अहवालही मागविला आहे.

-दीपक चाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बाल विकास)