नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काश्मीर पर्यटनासाठी (Kashmir Tourism) नाशिक जिल्ह्यातूनही (Nashik District) ६१ पर्यटक गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यव प्राधिकरण यांच्याकडून हेल्पलाईन नंबर जारी करत जिल्हा प्रशासनाशी नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) ८० हाल एजन्सीशी नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधण्यात आला. त्यात ५० पर्यटक ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत ६१ लोक गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ११ पर्यटक स्वतंत्ररीत्या गेल्याचे समजते. त्यांनीही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
जिल्ह्यातील एकूण ६९ पर्यटक (Tourist) सध्या जम्मू काश्मीर येथे असल्याबी माहिती आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. यात लहाने यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत त्यांची मुलगी व इतर आठ व्यक्ती श्रीनगर येथे असल्याची माहिती दिली. श्रीनगर येथे एकूण तीन कुटुंब गेले असून एकूण ८ व्यक्तींचा समावेश आहे. त्यात तीन महिला, तीन पुरुष व दोन लहान मुले असल्याचे समजते.
सर्वजण श्रीनगर (Shrinagar) येथे असूर त्यांचे विमानाचे तिकीट शनिवार (दि. २६) चे आहे. परंतु त्यांना परतण्यासाठी लवकर तिकीट मिळावे अशी त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे. तसेच सिद्धी मुसळे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत दोघे भाऊ बहीण श्रीनगर येथे सुरक्षित ठिकाणी असल्याचे कळवले आहे. परतण्यासाठी तिकिट मिळण्याची विनंती त्यांनी केली आहे. तर अजून एक पर्यटक पहलगाम येथील हॉटेलमध्ये सुरक्षित आहे
पर्यटकांकडून काश्मीर सहल रद्द
पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर कास्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असून त्याची झलक नाशिकमध्ये आजपासूनच दिसू लागली आहे. नाशिकमधून दरवर्षी साधारण एक लाखाच्या जवळपास पर्यटक काश्मीर, श्रीनगर, अमरनाथला जात असतात में व जून या दोन महिन्यात सर्वाधिक जाणा-यांची संख्या असते. यंदाही अमरनाथला जाण्यासाठी इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या मात्र आजपासून त्यानी प्लॅन बदलण्यास सुरुवात केली आहे त्याऐवजी शिणला, कुलू, मनाली, दार्जिलिंग, कोकण, गोवाकडे ते वळत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटकांनी त्याचे काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे तालचे माजी अध्यक्ष दत्ता मालेराव यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर पुढील ४-५ महिन्यांसाठी बुकिंग रद्द करण्याचे कोन येत आहेत. या हलल्यामुळे स्थानिक आणि पर्यटनाचे मोठे नुकसान होईल यात स्थानिक हॉटेल, विमान, रेल्वे बुकिंग रद्द करण्यात येत असल्याने याची झळ संबंधितांना बसणार आहे.
हेल्पलाईन नंबर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक नाशिक जिल्ह्याकरिता (०२५३-२३१७१५१), पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालयात पर्यटकांसाठी २४ तास मदत कक्ष व आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
संपर्क क्रमांक : ०१९४-२४८३६५१/०१९४-२४५७५४३
व्हाट्सॲप क्रमांक : ०७७८०८०५१४४ / ०१७७८०९३८३९७
आपत्कालीन नियंत्रण कक्ष, श्रीनगर : ०१९४-२४५७५४३/ ०१९४-२४८३६५१
जिल्हा प्रशासन, श्रीनगर २४ तास आपत्कालिन मदत कक्ष / पोलीस नियंत्रण कक्ष अनंतनाग : ९१ ९४१९०५१९४० (व्हाट्सॲप क्रमांक) / ९१९५९६७७७६६९/०१९३-२२२५०७०
दिल्ली नियंत्रण कक्ष : ०११ २३४३८२५२ / ०११ २३४३८२५३ आणि ०११ – २३०९३०५४.
ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षित ठिकाणांची माहिती
चौधरी यात्रा कंपनी ९ पैकी ४ जण पहलगाम तर ५ जण श्रीनगर
डेक्कन ट्रॅव्हल्स कंपनी रजण श्रीनगर
हरी ओम तूहल्स ४ जण
जॉय अॅन्ड जॉय हॉलिडेज २० जण सर्व जम्मुमधील हॉटेलमध्ये सुरक्षित
कौस्तुभ टूर्स सोबत १२ जण गुलमर्ग येथे
श्री दत्त हॉलिडेज ३ जण श्रीनगर येथे सुरक्षित आहेत.
स्वंतत्ररित्या गेलेले ११ जण त्यापैकी श्रीनगर येथे १० पर्यटक. तर पहलगाम येथे १ पर्यटक सुरक्षित असल्याचे समजते.