नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय लष्कराकडून गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. अखेर या फरार दहशतवाद्यांचा शोध लागला असून, त्यांना भारतीय लष्काराने (Indian Army) घेरल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी काश्मीरमधील जंगलात लपलेल्या पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) सहा दहशतवाद्यांना घेरल्याचे समजते. या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. परंतु, ही चकमक नेमकी कुठं सुरु आहे, त्याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
तसेच पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक (Pakistani Citizen) आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir) पोहचले नसल्याचे बोलले जात आहे. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. मंगळवारी ते दहशतवादी काश्मीरच्या जंगलांमध्ये सापडले. डोंगराळ भाग असल्यामुळे दहशतवाद्यांना वाहन वापरणे शक्य नव्हते. यामुळे हे दहशतवादी चालतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जात होते, अशी माहिती समोर आली आहे.