Thursday, April 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPahalgam Terror Attack : महाराष्ट्र सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी आणखी एका...

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्र सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी आणखी एका विमानाची व्यवस्था

१०० जणांची यादी जाहीर

मुंबई | Mumbai

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून (Maharashtra) जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले शेकडो नागरिक अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

यानंतर महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची (Flight) व्यवस्था केली आहे. या विशेष विमानातून १०० पर्यटकांना राज्यात परत आणले जाणार आहे.नुकतीच या १०० पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तसेच काल देखील राज्य सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून परत आणल्या जाणाऱ्या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती.

एअर इंडियाचे विमान १०० पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार

मुख्यमंत्री कार्यालयाने पोस्टमध्ये (CMO Office) म्हटले की, “काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.

दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज दोन विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कोच

Gautam Gambhir Death Threat: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi मंगळवारी काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच आता टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरला जीवे मारण्याची...