Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Boat Capsized : गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली

Mumbai Boat Capsized : गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली

६६ जणांना वाचविण्यात यश

मुंबई | Mumbai

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील (Gateway of India) समुद्रात एक प्रवासी बोट (Boat) बुडाल्याची घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला ही बोट जात होती. या बोटमध्ये ८० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली. त्यामध्ये ८० प्रवासी होते. त्यापैकी ६६ जणांना वाचविण्यात यश आले आहे.तर सदर ठिकाणी नौदल,जेएनपीट, कॉस्ट गार्ड यलोगेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. तसेच या दुर्घटनेत एकाचा मृत्यू (Death) झाल्याचे समजते. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत.

Mumbai Boat Capsized : गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली

नेमकं काय घडलं?

एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास ३० किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागतो. ३.३० च्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर ५ ते ८ किमी आतमध्ये ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...