नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections) लोकशाही (एनडीए) राष्ट्रीय आघाडीच्या जागावाटपाचा (Seat Shearing) फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २४३ विधानसभा जागांपैकी जेडीयू आणि भाजप जवळजवळ समान जागांवर निवडणूक (Election) लढवतील. यात जेडीयूला १०२ ते १०३ आणि भाजपला १०१ ते १०२ जागा देण्याचे ठरले आहे. एनडीएचे इतर मित्रपक्ष, चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला किती जागा द्यायच्या यासंदर्भातही फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने एनडीएमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे म्हटले आहे. यात नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयू आणि भाजपला (JDU and BJP) समान जागा मिळणे अपेक्षित आहे. चिराग यांच्या एलजेपी (आर) चे बिहारमध्ये ५ खासदार आहेत, त्यांना २५-२८ जागा मिळू शकतात, तर ४० जागांचा दावा करणाऱ्या जीतन मांझी यांच्या एचएएमला ६-७ जागा मिळू शकतात. २०२० च्या निवडणुकीतही पक्षाने ७ जागांवर निवडणूक लढवली आणि ४ जागा जिंकल्या होत्या.
तसेच, उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांच्या आरएलएमला ४-५ जागा देण्याचे ठरले आहे. या जागावाटपांतर्गत, एनडीएमधील घटक पक्षांना साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जागावाटप निश्चित मानले जाते परंतु त्याची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. जर आपण २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीबद्दल बोललो तर, त्यावेळी एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, एचएएम आणि मुकेश साहनी यांचे व्हीआयपी यांचा समावेश होता. त्यानंतर भाजपने ११०, जेडीयू ११५, एचएएम ७ आणि साहनी यांच्या पक्षाने ११ जागांवर निवडणूक लढवली. ज्यामध्ये भाजपने सर्वाधिक ७४ जागा जिंकल्या होत्या.