Wednesday, June 4, 2025
HomeनाशिकSanjay Raut: संजय राऊतांचा फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी; नेमके काय...

Sanjay Raut: संजय राऊतांचा फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी; नेमके काय घडले?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी आपण स्वत: तर नाराज असल्याचे सांगितले, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेटही घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यावर संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन केला आणि पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले. अचानक केलेल्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

काय म्हणाले संजय राऊत?

“देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महापालिकेच्या कामासंदर्भात बडगुजर त्यांना भेटले असतील. आमच्यासारखे काही कडवट शिवसैनिक अशा भेटीगाठी टाळतात. संशय निर्माण होईल अशा भेटी टाळायच्या असतात. कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरोधात कोणी कायदा आणलेला नाही” असे संजय राऊत सुधारकर बडगुजर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल बोलले. “नाशिकमध्ये प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या येत आहेत, तसे नाहीय. एखाद-दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली, म्हणून संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे, असे नाही. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याइतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते” असे संजय राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये एखाद दुसरा नाराज असेल. लोकांना लाभ हवे आहेत त्यासाठी नाराजी असते. एकनाथ शिंदे सुद्धा आमच्यासोबत असताना नाराज होते आता महायुतीत सुद्धा नाराज आहे. अजित पवार कधीही नाराज दिसत नाहीत. ते कुठेही असो, अजित पवार नाराज नसतात. मी म्हणजे पक्ष नाही, संघटना म्हणजे पक्ष आहे. सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, ते आमचे पदाधिकारी आहेत. भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचे आहे, असेही माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.

नेमके काय झाले?

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा शिवसेना उबाठा गटाचे नाशिक जिल्ह्याचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतरच नाशिकच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर मंगळवारी या चर्चांबद्दल विचारले असता त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठाला धक्का बसणार का? याची चर्चा रंगली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद बुधवारी आयोजित केली होती.

शिवसेना उबाठा गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. पण महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या उपस्थितीची चर्चा रंगली होती. यावेळी पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

“तुरुंगात ३०० कोटी मागितले, हा माणूस…”; जालिंदर सुपेकरांवर सुरेश धसांचा खळबळजनक...

0
मुंबई । Mumbai पैशासाठी सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हेदेखील अडचणीत आले आहेत. भाजप...