Sunday, May 18, 2025
Homeनगर‘आवास’ योजनेसाठी ओबीसी लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी

‘आवास’ योजनेसाठी ओबीसी लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांमधून आता ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे स्वतंत्र करून त्यांची नव्याने यादी तयार करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश केंद्र सरकारने जिल्हा परिषदेला दिले असून गाव पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गात असणार्‍या घरकुल पात्र असणार्‍या लाभार्थ्यांसाठी नवीन योजना आणण्यात येणार आहे. यासाठी ओबीसी प्रवर्गातील घरकुलासाठी पात्र असणार्‍यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने घरकुल पात्र लाभार्थी ‘ड’ वर्ग यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीला आवस प्लस असे संबोधण्यात येते. या यादीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जामती प्रवर्गात मोडणार्‍या घरकुल पात्र लाभार्थ्यांना वगळून ओबीसी, अल्पसंख्या आणि खुल्या प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे आहेत. या आवास प्लस घरकुल पात्र योजनेच्या यादीत 1 लाख 60 लाभार्थी असून त्यांच्यातून आता ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थी यांचे नावे वेगळी काढण्यात येत आहे. यासाठी गावोगावी ग्रामसेवकांना कामाला लावण्यात आलेले आहे.

2011 च्या आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ज्या पात्र लाभार्थी यांची नावे घरकुलांसाठी आलेली नव्हती, मात्र घरकुल योजनेसाठी ते पात्र होती, अशांची नावे 2019 ला ऑनलाईन पध्दतीने माहिती घेवून त्यातून पात्र असणार्‍या जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार लाभार्थी कुटूंबाची यादी तयार करण्यात आली. या आवास योजनेतून आता 1 लाख 15 हजार ओबीसी प्रवर्गातील घरकुल पात्र लाभार्थी यांची नावे स्वतंत्र करण्यात येत आहे. या ओबीसी पात्र लाभार्थींसाठी केंद्र सरकार नव्याने घरकुल योजनेची घोषणा करणार आहे. याबाबत अद्याप स्पष्ट सुचना नसल्या तरी पहिल्या टप्यात घरकुलासाठी पात्र असणार्‍या ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र लाभार्थीं यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

आवास प्लसमधील पात्र लाभार्थी

अकोले 18 हजार 460, जामखेड 12 हजार 174, कर्जत 17 हजार 374, कोपरगाव 8 हजार 144, नगर 6 हजार 774, नेवासा 14 हजार 929, पारनेर 6 हजार 273, पाथर्डी 15 हजार 95, राहाता 8 हजार 909, संगमनेर 15 हजार 975, शेवगाव 12 हजार 393, श्रीगोंदा 7 हजार 452 आणि श्रीरामपूर 7 हजार 832 अशी असून यातून 1 लाख 15 हजार ओबीसी लाभार्थी यांची नावे वेगळी करण्यात येत आहेत.

असे आहे घरकुलाचे अनुदान

पंतप्रधान आवास योजनेत पात्र ठरणार्‍या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून घरकुलासाठी 1 लाख 53 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात 1 लाख 20 हजार घरकुलासाठी यासोबत शौचालयासाठी स्वतंत्रपणे 12 हजार आणि महात्मा फुले रोजगार हमी योजनेतून 23 हजार अशा प्रकारे 1 लाख 53 हजार अनुदान प्रत्येक घरकुलासाठी देण्यात येते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...