रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
धरणामध्ये पाणीसाठा चांगला असतानाही शेतीला रब्बीसाठी वेळेत आवर्तन मिळेऩा. त्यामुळे रब्बीची पिके जळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लाखोंचा पोशिंदा समजणार्या शेतकर्यांवर वाईट परिस्थिती ओढावली आहे.
शेतकर्यांची रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली असून मका, गहू, हरभरा, कांदा यासारख्या पिकांना आज पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकर्यांच्या विहिरींनी सध्या तळ गाठला असून विहिरीत व विंधन विहिरीत असलेले पाणी शेती पिकाला देण्यासाठी शेतकर्यांचे रात्रंदिवस कष्ट सुरू आहे. मात्र विज बिलाअभावी रोहीत्र बंद करण्याचा सपाटा विज वितरणच्या कर्मचार्यांनी लावला आहे. गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे म्हणून गेल्या महिन्यापासून सातत्याने मागणी होत आहे. मात्र पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकर्यांचे पिके जळाल्यावर गोदावरी कालव्यांना पाणी सोडणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पिकांना एकदा पाणीटंचाईचा झटका बसला की पिके सुधारत नाही. त्यातुन खर्चही निघत नाही.
एकीकडे विद्युत वितरण कंपनीने शेतकर्यांची वीज तोडली तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाकडून गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळेना. त्यामुळे आता शेतकर्यांच्या हातात रब्बीचे पिके येते की नाही असा प्रश्न पडत आहे. कोपरगाव तालुक्यात गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यावर फार मोठी शेती अवलंबून आहे. मागच्या अवर्तनातही कमी दिवस पाणी मिळाले. आवर्तन वेळेत येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. नेहमीच तारीख पे तारीख सांगणारे सगळेच सध्या शांत आहे. आवर्तनासाठी आता शेतकर्यांनाच आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच शेतीला पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र फक्त नियोजन नसल्याने पाटपाण्याची शेती धोक्यात आली आहे.
– सुनिल देवकर (शेतकरी)