Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयKiren Rijiju : राहुल गांधी तक्रार करत नाही, केवळ रडतात; भाजपाने केला...

Kiren Rijiju : राहुल गांधी तक्रार करत नाही, केवळ रडतात; भाजपाने केला पलटवार

दिल्ली । Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अगदी एक दिवस आधी केलेल्या एका वक्तव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडण्याचा इशारा देत हरियाणामधील मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट मतं टाकली गेल्याचा गंभीर आरोप केला.

- Advertisement -

राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत हरियाणातील मतदार यादीत तब्बल २५ लाख खोट्या मतांची नोंद झाल्याचा दावा केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी एका ब्राझिलियन मॉडेलच्या फोटोंचा आधार घेऊन, त्या महिलेने २२ वेळा मतदान केल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. या आरोपांमुळे काँग्रेसने निवडणुकीच्या वैधतेबद्दल शंका उपस्थित केली आहे.

YouTube video player

राहुल गांधींच्या या सनसनाटी आरोपांवर सत्ताधारी भाजपनेही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. “या पत्रकार परिषदेला उत्तर देणे माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारे आहे. कारण बोलायला काही चांगला मुद्दाच नाही. राहुल गांधींच्या बिनबुडाच्या आरोपांवर काय बोलायचं?” असे म्हणत रिजिजू यांनी राहुल गांधींच्या दाव्यांची खिल्ली उडवली.

रिजिजू यांनी राहुल गांधींच्या जुन्या कृतींचा उल्लेख करत म्हटले की, राहुल गांधी एका महिलेचा फोटो टी-शर्टवर दाखवत फिरले होते, पण नंतर त्या महिलेनेच त्यांना फटकारले. “ते नेहमीच बनावट नावं आणि बनावट गोष्टींवर बोलत असतात,” असे टीकास्त्र रिजिजू यांनी सोडले. बिहारमध्ये मतदान सुरू असताना राहुल गांधी हरियाणाबद्दल बोलत असल्याबद्दल रिजिजू यांनी आश्चर्य व्यक्त केले. “आता बिहारमध्ये मतदान सुरू आहे, पण ते त्याकडे दुर्लक्ष करून हरियाणाची कथा सांगत आहेत. कारण बिहारमध्ये त्यांचं काही उरलेलं नाही,” असे म्हणत केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसच्या बिहारमधील स्थितीवर भाष्य केले.

रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “पार्लमेंट चालू असताना राहुल गांधी परदेशात फिरत असतात. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी गंभीर विषयांवर बोलायला हवं, पण ते अवास्तव आणि निराधार आरोप करत आहेत.” हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत रिजिजू म्हणाले, “हरियाणाच्या एग्झिट पोल्स आणि ओपिनियन पोल्समध्ये काँग्रेस पुढे होती, पण प्रत्यक्षात निकाल लागल्यावर काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे आता ते थेट निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.” निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने ते असे आरोप करत असल्याचे त्यांनी सुचवले.

राहुल गांधींनी वापरलेल्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ या शब्दावरही रिजिजू यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधींचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ कधीच फुटत नाही. ते नेहमीच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगतात.” देशातील जनता आनंदी आहे, पण “अडचण फक्त राहुल गांधींनाच आहे,” असे स्पष्ट मत रिजिजू यांनी व्यक्त केले. राहुल गांधींच्या आरोपांवरून आणि त्यावर भाजपने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमक आणखी तीव्र झाली आहे. बिहार निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या वक्तव्यांचे निवडणुकीवर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...