Tuesday, April 29, 2025
Homeनगरवरिष्ठांच्या आदेशानंतरच रेल्वे हद्दवाढीचे खांब रोवले

वरिष्ठांच्या आदेशानंतरच रेल्वे हद्दवाढीचे खांब रोवले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग निर्माण होत असतानाच रेल्वेची हद्दवाढ निश्चित झाली होती. मात्र सध्या रेल्वे दुहेरीकरण मार्गाचे काम पूर्ण होत आल्यामुळे पुन्हा एकदा हद्दवाढ निश्चित करण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे प्रशासनाने खांब रोवले आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशानंतरच रेल्वे हद्दवाढीचे खांब रोवण्यात आले असल्याची माहिती रेल्वेच्या अहमदनगर मंडलचे सहायक अभियंता वाय. एम. व्हटकर यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान या हद्दवाढीसाठी खांब रोवून हद्दवाढ निश्चित केली आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही किंवा गैरसोय होणार नाही यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवू, असे आश्वासन खा. सदाशिव लोखंडे यांनी दिले.

रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशानुसार दोन्ही बाजुने म्हणजे दक्षिण बाजुने 29.5 तर उत्तरेकडून 31.5 असे नियमानुसार अंतर सोडणेसाठी ठिकठिकाणी सिमेंट पोल रोवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अनेक नागरिकांचे पक्के बांधकामे रेल्वे प्रशासन तोडणार, उद्योग व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने जाणार, काहींना वापरण्यासाठी रस्ताच शोधावा लागणार अशा एक ना अनेक शंका उपस्थित होवू लागल्याने काही नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हा प्रश्न खा. सदाशिव लोखंडे यांच्यासमोर मांडला. त्यानुसार त्यांनी काल पालिका सभागृहात बैठक घेतली. या बैठकीसाठी खा. सदाशिव लोखंडे, रेल्वे मंडलचे सहा. अभियंता वाय. एम. व्हटकर, श्रीरामपूर येथील रेल्वेचे अधिकारी श्री. दुबेे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी रेल्वेची हद्द कधी निश्चित झाली? ती कुठपर्यंत असणार आहे? या सर्व बाबी दाखविल्या. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे व पालिकेच्या अधिकार्‍यांनीही पालिकेची हद्द कशी आहे याबाबत माहिती दिली. यावेळी अधिकार्‍यांना सोबत घेऊन सुतगिरणीपासून ओव्हरब्रीजपर्यंत पाहणी करण्यात आली. रेल्वे लाईनच्या कडेला राहणारे नागरिक व छोटा-मोठा व्यवसाय करणार्‍यांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी नगरध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थान माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी जिल्ह परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, मुख्यााधिकारी गणेश शिंदे, दिलीप नागरे, मुज्जफर शेख, लक्ष्मण कुमावत, मुख्तार शहा, भाजपा नेते प्रकाश चित्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, राजेंद्र सोनवणे, शाम अढागळे, शिवसेना शहरप्रमुख सुधीर वायखिंडे, राजेंद्र भोसले, रियाज पठाण, डॉ. दिलीप शिरसाठ, तालुकाप्रमुख बापू शेरकर, युवा जिल्हा प्रमुख शुभम वाघ, माधव टिपरे, शिवनाथ फोफसे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

रेल्वे हद्दवाढ आता केलेली नाही. ती जुनीच आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या सूचनेनंतरच नियानुसार हद्दवाढ निश्चित करुन पोल रोवले आहेत. हा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पाठवू. त्यानंतर त्यांच्या सूचना अथवा आदेश आल्यानंतरच पुढे काय करायचे याचा निर्णय होईल. सध्या फक्त हद्दवाढ करुन पोल रोवले आहेत.

– वाय. एम. व्हटकर रेल्वे मंडल सहा. अभियंता, नगर

रेल्वेच्या या हद्दवाढीमुळे जर नागरिकांनीचे नुकसान होणार असेल अथवा गैरसोय होणार असेल तर आपण रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत योग्य निर्णयासाठी प्रयत्न करु.

– खा. सदाशिव लोखंडे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : भाविकांची गाडी उलटल्याने भीषण अपघात; २६ जण जखमी,...

0
वणी नांदुरी | वार्ताहर | Vani - Nanduri  सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) नवस पूर्तिसाठी जाणार्‍या भाविकांची (Devottes) गाडी दरेगाव फाट्यानजीक उलटल्याने २६ जण जखमी...