Wednesday, April 23, 2025
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : "हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा...";...

Raj Thackeray : “हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा…”; राज ठाकरेंचा संताप

मुंबई । Mumbai

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारनंतर दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातीलही काही पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान या दहतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे,” असं राज ठाकरेंनी पहगाममधील हल्ल्यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. “या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील,” असं राज ठाकरे म्हणालेत.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

https://x.com/RajThackeray/status/1914862955042054273

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…

केंद्र सरकारने काश्मीरमधून 370 कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….

हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था  जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा...