Monday, February 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: अन् "मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे"…राज ठाकरेंकडून...

Raj Thackeray: अन् “मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे”…राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत, ते कलासक्त राजकारणी आहेत. स्वत: व्यंगचित्रकार आहेत. त्यांचा व्यासंग अत्यंत दांडगा आहे. प्रत्येक गोष्टीचे त्यांचे बारीक निरीक्षण असते. सिनेमासारखेच चित्रपट आणि नाटक हे त्यांचे आवडते पॅशन आहे. राज ठाकरे यांना सिनेमाप्रमाणेच नाटकाचंही प्रचंड वेड आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमधून ‘सुख पाहता’ या नाटकाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. घरातील लायब्ररीत ‘सुख पाहता’चे पुस्तक सापडले आणि राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज ठाकरेंनी मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय, आणि दिग्गज नाटककार वसंत कानेटकर यांच्यासंदर्भातली एक आठवण सांगितली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचे पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले?
राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, “काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहीत नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा, अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं!”

YouTube video player

भूतकाळातली आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “घडलं असं की, 1989 साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की, मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की, त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की, नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीनं विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो…”

“पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की, मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे, यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो, त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकात यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती, ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की, मी करतो मुखपृष्ठ…”, असं राज ठाकरे म्हणाले.

“एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं…”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…”, असं राज ठाकरे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; ‘या’ मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता

0
मुंबई | Mumbai राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सोमवार (दि २३) पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तर...