Wednesday, April 23, 2025
Homeनगर...तर शेतकर्‍यांनी महायुतीतील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे- राजू शेट्टी

…तर शेतकर्‍यांनी महायुतीतील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे- राजू शेट्टी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत भावनिक करुन शेतकर्‍यांची मते घेतली. आता राज्याची स्थिती चांगली नाही, असे सांगत हात वर करतात. त्यामुळे महायुतीतील या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना शेतकर्‍यांनी जाब विचारला पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत केले आहे.
राजू शेट्टी यांचा राहुरी तालुक्यात उसाच्या एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना एकाचवेळी देण्याचा न्यायालयातील खटला जिंकल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.

- Advertisement -

राज्यात एक नियमच झाला आहे. सरकार कोणाचेही असो अर्थमंत्री अजित पवारच. मागील सरकारमध्ये आणि आताच्या सरकार मध्येही अजित पवारच अर्थमंत्री आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जाहीरनामा काढला होता. आमचे सरकार राज्यात आले तर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं म्हणाले होते. मात्र आता राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही असे सांगतात. अजित पवारांना राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ते माहिती नव्हते का? शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे शक्य नाही तरीही पवारांनी का तसा जाहीरनामा काढला? यांच्या मनात पाप होते.

शेतकर्‍यांना भावनिक करुन मते मिळवली आणि आता हात वर करत आहेत. आता शेतकरी संतापले आहेत. महाडमध्ये शेतकर्‍यांनी शंभूराजे देसाई यांना आणि अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. कर्ज माफीचे काय झाले. आता महायुती मधील तीनही पक्षांच्या मंत्र्यांना राज्यात कुठेही गेले तर त्यांना शेतकर्‍यांनी आमचा सातबारा कधी कोरा करणार म्हणून जाब विचारायला पाहिजे.वेळ प्रसंगी यांना तुडवून हाणलं पाहिजे. कसे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार नाही? असा जाब विचारण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

परभणीत शेतकर्‍याने दीड लाखांच्या कर्जसाठी आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीने देखील आत्महत्या केली. आणि सरकार अहिल्यानगर येथील चौंडी येथे होणार्‍या एक दिवसीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी दिडशे कोटींचं टेंडर काढते. यावरून देखील राजू शेट्टी यांनी सरकारला चांगलेच घेरले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना रायगड पासून सुतारवाडीपर्यंत आंब्याचा वाटीभर रस पिण्यासाठी जाण्याकरिता दीड कोटी रुपये खर्चून हेलिपॅड तयार केला. यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, असा जोरदार घणाघात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर केला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू- मुख्यमंत्री फडणवीस

0
मुंबई | पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून...