Friday, January 23, 2026
Homeनगरराजूर परिसरात काविळच्या साथीचे थैमान

राजूर परिसरात काविळच्या साथीचे थैमान

100 हून अधिक रुग्णांची नोंद || अनेकजण रुग्णालयात दाखल

राजूर |वार्ताहर| Rajur

राजुर व परिसरात कावीळच्या साथीने जोर धरला असून आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अनेकांना संगमनेर, राजूर व अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साथीचे प्रमुख कारण अजून पुढे आले नाही मात्र आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

गावातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी सुरू असून जलस्रोतांवर क्लोरीनेशन केले जात आहे. नागरिकांना उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात जनजागृतीसाठी पत्रके, बॅनर व मोबाईल संदेशाद्वारे मोहीम राबवली जात आहे. आरोग्य विभागाने गावात आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली असून शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी तपासण्या केल्या जात जात आहे. अकोले तालुक्यातील विठे येथील प्राथमिक केंद्रातील आरोग्य निरीक्षक डी.एल. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे आरोग्य पथकाने राजूरमध्ये येऊन ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार्‍या टाकीतील पाणी तपासणीसाठी तसेच इतरही काही ठिकाणातील पाणी व इतर काही पदार्थ तपासणीसाठी पाठवलेले आहे.

YouTube video player

ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे, त्याचबरोबर उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, उघड्यावरील थंड पेय तसेच पदार्थ खाऊ नये, तसेच वारंवार जास्त थंड पेय पिऊ नये, असे आवाहन आरोग्य निरीक्षक शेळके यांनी केले आहे.
या संदर्भात राजूर येथे बैठक होऊन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आरोग्य विभागाला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...