टिळकनगर|वार्ताहर|Tilaknagar
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार्या पाच किलो तांदूळ ऐवजी आता माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाचे सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी काढले आहे.
केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक 8 जुलैच्या पत्रान्वये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी मोफत वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे नियतन प्राप्त झाले असून अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना आता मोफत अन्नधान्य प्रति माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.
एप्रिल मे व जुन या महीन्यासाठी प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आलेला होता. करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजना नोव्हेंबर पर्यत वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्रधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति माणसी पाच किलो धान्य मोफत देण्यात येणार असून त्यात माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्य व्यतिरीक्त उपलब्ध करुन देण्यात येत असुन कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.
केंद्र शासनाच्या सूचना नुसार कोविड -19 आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतीय अन्न महामंंडळाच्या गोदामातून एकाचवेळी दोन महिन्याच्या अन्नधान्याची उचल करावी तसेच लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अन्न धान्य एकाच वेळेस वितरीत करावे असेही परिपत्रकात म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी आंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी करीता अतिरीक्त नियतना नुसार अन्नधान्याचा साठा मूक्त करण्याच्या सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी 429349 आहे तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी 2640164 आहे दोन्ही योजनांचे मिळून एकुण लाभार्थी 3069513 आहेत त्या नुसार जिल्ह्याला 9209 गहु व 6137 टन तांदूळ दिला जाणार आहे.