Tuesday, May 27, 2025
Homeनाशिकशेतीच्या वाटपपत्र दस्तावरील नोंदणी शुल्क माफ

शेतीच्या वाटपपत्र दस्तावरील नोंदणी शुल्क माफ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी रुपयांची घट येऊ शकते. मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे. मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही. मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करीत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भाग्यश्री विसपुते यांनी स्वीकारला धुळे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

0
धुळे : धुळेच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आज दुपारी धुळे...