मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली…
ही भरती का थांबवण्यात आली? याबाबत कुठलीच स्पष्टता नव्हती. आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला असून राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील ‘या’ ठिकाणी एकदा भेट द्याच
यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र करोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होते. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली. त्यामुळेच आता सरकारने आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
ना पाणी ना जेवण ना झोप…; ‘त्याने’ केला ११ दिवसांत १३ हजार किमीचा प्रवास
ज्या उमेदवारांनी करोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेस अपात्र होते. या उमेदवारांच्या वयोमर्यादेत आता शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीसाठी संधी उपलब्ध झाल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.