मुंबई | Mumbai
न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत (ODI Series) पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ टी २० मालिकेसाठी (T20 series) सज्ज झाला असून हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. पंरतु, त्याअगोदरच भारतीय संघाला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे…
उद्या (शुक्रवार) रांची येथे भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात पहिला टी २० सामना खेळविला जाणार आहे. मात्र सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) मनगटाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली असून तो तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाल्याचे समजते. तसेच त्याला पुढील उपचारासाठी बेंगलोर येथील एनसीएमध्ये (NCA) पाठवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, याआधीही दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात (Indian team) खेळण्याची संधी गमवावी लागली होती. त्यावेळीही मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरोधातील टी २० मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा न्यूझीलंडविरोधात मायदेशात होणाऱ्या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे.