आष्टी |प्रतिनिधी| Ashti
राहत्या छपराच्या घराला आग लागून पाच शेळ्या, दोन लाख रूपये व साहित्य जळून खाक झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे सोमवारी (दि.1) रात्री घडली.
- Advertisement -
याप्रकरणी वाहिरा येथील बापू महंमद शेख यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शेख कुटुंबिय सोमवारी रात्री जेवण करून शेतवस्तीवरील घरात झोपले असता अचानक घराला लागली. आगीत संसारउपयोगी वस्तु रोख दोन लाख रूपये, पाच शेळ्या धान्य असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनास्थळी महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी भेट देऊन पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेख यानी केली आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजले नाही.